शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

औंढा तालुक्यातील ५० गावांत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:04 IST

तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देचारा छावणी उभारा ५ गावात होतोय टँकरने पाणी पुरवठा

औंढा नागनाथ : तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अशा भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे पाणीटंचाई चा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे हे गुरुवारी तालुक्यातील गावांचा दौरा करणार आहेतऔंढा नागनाथ तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहेत. यातील रामेश्वर, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा व येहळेगाव सोळंके, लोहारा खुर्द, लक्ष्मण नाईक तांडा या ५ गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सांगितले. सेवालाल तांड्यात देखील टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मार्च महिना सुरु झाल्यानंतर तालुक्यातील पाणीपातळीत झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाझर तलाव, साठवण तलावासह सर्वच स्त्रोत आटल्याने विहिरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. तालुक्यात वडद, देवाळा तुर्क पिंपरी, सिद्धेश्वर तांडा, सावळी बै., टाकळखोपा, जलालपूर, सावळी बै.तांडा, सिद्धेश्वर, लांडाळा, रांजाळा, औंढा नागनाथ, रामेश्वर, गांगलवाडी, अंजनवाडा, देवतळा, सेंदुरसना, काठोडातांडा, पूर, दुघाळा, येडूत, काशीतांडा, मूतीर्जापूर सावंगी, दुघाळा, येडूद, लाख, आसोला तर्फे औंढा, धारखेड, रुपुर, सावळी बै., येळी सेंदूरसना, आजरसोंडा, पिंपळा, केळी, हिवरा जाटू, पारडी सावळी, उंडेगाव, अंजनवाडा, जांभळी, पाझरतांडा, या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने प्रशासनाने या गावात २ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे अधिग्रहण केले आहे. अजून १० गावांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत. या प्रस्तावावरही लवकरच कार्यवाही होणार असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी भोसी, सिद्धेश्वर, पिंपळदरी सर्कलसह अनेक डोंगराळ भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना ३ ते ४ कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. माणसांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.पालकमंत्री टंचाईच्या दौ-यावरऔंढा तालुक्यातील जवळपास गावे पाणीटंचाईने ग्रस्त आहेत. प्रशासनाने १०१ गावांपैकी ५५ गावांच्यावर उपाय योजना केली आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका सोडला तर सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. आता या तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे हे शासनाचा लवाजमा घेऊन पाहणी करणार आहेत. तसेच ब्राम्हणवाडा येथे सायंकाळी ५ वाजता शहीद संतोष चव्हाण यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. औंढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.औंढा तालुका दुष्काळाने होरपळत आहेऔंढा तालुका दुष्काळाने होरपळत आहे. या परिस्थिती शेतकऱ्यांना जनावरांचा संभाळ करणे कठीण झाले असून त्यांची दमछाक होत आहे. चाराटंचाईमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.पाणी आणि चारा उपलब्ध होत नसल्याने या भागातील शेतकºयांवर कवडीमोल दराने जनांवरे विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील भागामध्ये चारा छावण्या उभारण्याची आवश्यकता असून या संदर्भात पालकमंत्री व शासनाकडे तशी मागणी करणार असल्याची माहिती आ.डॉ संतोष टारफे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका सोडला तर सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई