शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

औंढा तालुक्यातील ५० गावांत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:04 IST

तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देचारा छावणी उभारा ५ गावात होतोय टँकरने पाणी पुरवठा

औंढा नागनाथ : तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अशा भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे पाणीटंचाई चा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे हे गुरुवारी तालुक्यातील गावांचा दौरा करणार आहेतऔंढा नागनाथ तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहेत. यातील रामेश्वर, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा व येहळेगाव सोळंके, लोहारा खुर्द, लक्ष्मण नाईक तांडा या ५ गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सांगितले. सेवालाल तांड्यात देखील टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मार्च महिना सुरु झाल्यानंतर तालुक्यातील पाणीपातळीत झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाझर तलाव, साठवण तलावासह सर्वच स्त्रोत आटल्याने विहिरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. तालुक्यात वडद, देवाळा तुर्क पिंपरी, सिद्धेश्वर तांडा, सावळी बै., टाकळखोपा, जलालपूर, सावळी बै.तांडा, सिद्धेश्वर, लांडाळा, रांजाळा, औंढा नागनाथ, रामेश्वर, गांगलवाडी, अंजनवाडा, देवतळा, सेंदुरसना, काठोडातांडा, पूर, दुघाळा, येडूत, काशीतांडा, मूतीर्जापूर सावंगी, दुघाळा, येडूद, लाख, आसोला तर्फे औंढा, धारखेड, रुपुर, सावळी बै., येळी सेंदूरसना, आजरसोंडा, पिंपळा, केळी, हिवरा जाटू, पारडी सावळी, उंडेगाव, अंजनवाडा, जांभळी, पाझरतांडा, या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने प्रशासनाने या गावात २ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे अधिग्रहण केले आहे. अजून १० गावांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत. या प्रस्तावावरही लवकरच कार्यवाही होणार असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी भोसी, सिद्धेश्वर, पिंपळदरी सर्कलसह अनेक डोंगराळ भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना ३ ते ४ कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. माणसांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.पालकमंत्री टंचाईच्या दौ-यावरऔंढा तालुक्यातील जवळपास गावे पाणीटंचाईने ग्रस्त आहेत. प्रशासनाने १०१ गावांपैकी ५५ गावांच्यावर उपाय योजना केली आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका सोडला तर सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. आता या तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे हे शासनाचा लवाजमा घेऊन पाहणी करणार आहेत. तसेच ब्राम्हणवाडा येथे सायंकाळी ५ वाजता शहीद संतोष चव्हाण यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. औंढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.औंढा तालुका दुष्काळाने होरपळत आहेऔंढा तालुका दुष्काळाने होरपळत आहे. या परिस्थिती शेतकऱ्यांना जनावरांचा संभाळ करणे कठीण झाले असून त्यांची दमछाक होत आहे. चाराटंचाईमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.पाणी आणि चारा उपलब्ध होत नसल्याने या भागातील शेतकºयांवर कवडीमोल दराने जनांवरे विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील भागामध्ये चारा छावण्या उभारण्याची आवश्यकता असून या संदर्भात पालकमंत्री व शासनाकडे तशी मागणी करणार असल्याची माहिती आ.डॉ संतोष टारफे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका सोडला तर सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई