शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

आठवड्यात दोघांचा बळी, तरीही बाजारपेठेतील गर्दी हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी २४ रुग्ण आढळून आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी २४ रुग्ण आढळून आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात दोघांचा मृत्यू झाला तरी नागरिकांना अजूनही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभासह धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दी कायम राहत आहे त्यामुळे तीन दिवसांतील कोरोना रुग्णांचा आकडा शंभराजवळ पोचला आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट घेतली जात आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव परिसरात जवळपास १०४ जणांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट घेतली असता कळमनुरी परिसरात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच हिंगोली व सेनगाव परिसरातील काही संशयितांची तपासणी केली असता यामध्ये हिंगोली परिसरात २२, तर सेनगाव परिसरात एक रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या सावरकरनगरातील ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणारे दहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ५ झाली असून, त्यापैकी ३ हजार ७७४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला १७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनातर्फ ठोस कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रात्रीला संचारबंदी लागू केल्यानंतरही काही भागांत नागरिक खुलेआम फिरत असल्याचे चित्र आहे. काही व्यापारी ग्राहकांमध्ये फिजिकल डिस्टन्स राहावे, यासाठी दुकानापुढे चौकोन तयार करीत असले तरी शहरात कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेल्या भागातील दुकानेही सुरू असल्याचे गुरुवारी पहावयास मिळाले. तसेच नागरिकांची गर्दी कायम राहत असल्याने कोरोनाचा धोका घट्ट होत आहे.

परवानगीसाठी नागरिक त्रस्त

जिल्ह्यात रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लग्न समारंभासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेकांनी लग्न सोहळे आयोजित केले होते. आता लग्न सोहळे आयोजित करणाऱ्या पित्यांची मोठी पंचाईत झाली आह. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीसाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण परवानगी न घेताच लग्न सोहळे उरकत आहेत. त्यात ग्रामीण भागासह शहरातही धार्मिक कार्यक्रमांना शेकडोंची गर्दी राहत आहे. ही गर्दी कमी करण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नसल्याचे चित्र आहे.