शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

आठवड्यात दोघांचा बळी, तरीही बाजारपेठेतील गर्दी हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी २४ रुग्ण आढळून आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी २४ रुग्ण आढळून आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात दोघांचा मृत्यू झाला तरी नागरिकांना अजूनही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभासह धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दी कायम राहत आहे त्यामुळे तीन दिवसांतील कोरोना रुग्णांचा आकडा शंभराजवळ पोचला आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट घेतली जात आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव परिसरात जवळपास १०४ जणांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट घेतली असता कळमनुरी परिसरात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच हिंगोली व सेनगाव परिसरातील काही संशयितांची तपासणी केली असता यामध्ये हिंगोली परिसरात २२, तर सेनगाव परिसरात एक रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या सावरकरनगरातील ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणारे दहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ५ झाली असून, त्यापैकी ३ हजार ७७४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला १७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनातर्फ ठोस कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रात्रीला संचारबंदी लागू केल्यानंतरही काही भागांत नागरिक खुलेआम फिरत असल्याचे चित्र आहे. काही व्यापारी ग्राहकांमध्ये फिजिकल डिस्टन्स राहावे, यासाठी दुकानापुढे चौकोन तयार करीत असले तरी शहरात कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेल्या भागातील दुकानेही सुरू असल्याचे गुरुवारी पहावयास मिळाले. तसेच नागरिकांची गर्दी कायम राहत असल्याने कोरोनाचा धोका घट्ट होत आहे.

परवानगीसाठी नागरिक त्रस्त

जिल्ह्यात रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लग्न समारंभासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेकांनी लग्न सोहळे आयोजित केले होते. आता लग्न सोहळे आयोजित करणाऱ्या पित्यांची मोठी पंचाईत झाली आह. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीसाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण परवानगी न घेताच लग्न सोहळे उरकत आहेत. त्यात ग्रामीण भागासह शहरातही धार्मिक कार्यक्रमांना शेकडोंची गर्दी राहत आहे. ही गर्दी कमी करण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नसल्याचे चित्र आहे.