शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
4
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
5
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
6
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
7
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
8
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
9
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
10
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
11
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
12
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
13
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
14
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
16
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
17
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
18
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
19
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
20
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का

दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:29 IST

जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्या दुष्काळझळांची तीव्रता जाणवत आहे. मात्र निवडणुकांतील राजकीय गोंगाटात जनतेला आपला आवाज कोणी ऐकणार नाही, याची जाणीव झाल्याने निमूटपणे हे सगळे सहन करण्याची वेळ आली आहे. टंचाईत पाण्याचा प्रश्न तर सगळीकडे बिकट आहे. मात्र निवडणुकीच्या कामाचे व आचारसंहितेचे कारण दाखवून कोरड पडलेल्या घशाने आवाज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेकडे कुणाचेही लक्ष नाही. शिवाय पुढारीही टंचाई आचारसंहितेच्या बाहेरची बाब असली तरीही यावर चकार शब्दही बोलत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणून गावोगावचे लोक पारावरच्या राजकीय गप्पांमध्येच टंचाईवर बोलत आहेत. इसापूर धरणात जिवंतसाठा २५२ दलघमी असून हे प्रमाण २६.२१ टक्के आहे. तर सध्या या धरणाची पाणीपाळी सुरू असल्याने विसर्गही होत आहे.येलदरी धरणात १0२ दलघमी मृतसाठा तर सिद्धेश्वर धरणात १६७.२५५ दलघमी मृतसाठा आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या तलावांपैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव हे जोत्याखाली गेले. तर सवड तलावात ३ टक्के जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव जोत्याखाली तर घोडदरी तलावात १ टक्के जलसाठा आहे. औंढा तालुक्यातील वाळकी, सुरेगाव, सेंदूरसना, काकडदाभा व केळी हे तलाव जोत्याखाली गेले. तर सुरेगाव ८ टक्के, औंढा ४१ टक्के, पुरजळ-२ टक्के, पिंपळदरी १९ टक्के पाणीसाठा आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी ८ टक्के, बोथी १0 टक्के, दांडेगाव ३ टक्के तर देवधरी जोत्याखाली आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावात १८ टक्के जलसाठा आहे. पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावही जोत्याखाली गेला आहे.याशिवाय पाच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांत एकूण १८ टक्के जलसाठा आहे. यात सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा ५ टक्के, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १४ टक्के, परभणी तालुक्यातील राहाटी ६३ टक्के तर हिंगोली तालुक्यातील खेर्डा तलाव कोरडा पडला आहे.जिल्हा यंदा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. शासनाकडून जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता हैराण आहे.यावर्षी पाऊस कमी पडल्याने नदी, नाले, ओढेही दुधडी भरून वाहिले नाहित. त्यामुळे यंदा पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय-योजनांची मागणी होत आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण