शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:29 IST

जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्या दुष्काळझळांची तीव्रता जाणवत आहे. मात्र निवडणुकांतील राजकीय गोंगाटात जनतेला आपला आवाज कोणी ऐकणार नाही, याची जाणीव झाल्याने निमूटपणे हे सगळे सहन करण्याची वेळ आली आहे. टंचाईत पाण्याचा प्रश्न तर सगळीकडे बिकट आहे. मात्र निवडणुकीच्या कामाचे व आचारसंहितेचे कारण दाखवून कोरड पडलेल्या घशाने आवाज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेकडे कुणाचेही लक्ष नाही. शिवाय पुढारीही टंचाई आचारसंहितेच्या बाहेरची बाब असली तरीही यावर चकार शब्दही बोलत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणून गावोगावचे लोक पारावरच्या राजकीय गप्पांमध्येच टंचाईवर बोलत आहेत. इसापूर धरणात जिवंतसाठा २५२ दलघमी असून हे प्रमाण २६.२१ टक्के आहे. तर सध्या या धरणाची पाणीपाळी सुरू असल्याने विसर्गही होत आहे.येलदरी धरणात १0२ दलघमी मृतसाठा तर सिद्धेश्वर धरणात १६७.२५५ दलघमी मृतसाठा आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या तलावांपैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव हे जोत्याखाली गेले. तर सवड तलावात ३ टक्के जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव जोत्याखाली तर घोडदरी तलावात १ टक्के जलसाठा आहे. औंढा तालुक्यातील वाळकी, सुरेगाव, सेंदूरसना, काकडदाभा व केळी हे तलाव जोत्याखाली गेले. तर सुरेगाव ८ टक्के, औंढा ४१ टक्के, पुरजळ-२ टक्के, पिंपळदरी १९ टक्के पाणीसाठा आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी ८ टक्के, बोथी १0 टक्के, दांडेगाव ३ टक्के तर देवधरी जोत्याखाली आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावात १८ टक्के जलसाठा आहे. पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावही जोत्याखाली गेला आहे.याशिवाय पाच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांत एकूण १८ टक्के जलसाठा आहे. यात सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा ५ टक्के, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १४ टक्के, परभणी तालुक्यातील राहाटी ६३ टक्के तर हिंगोली तालुक्यातील खेर्डा तलाव कोरडा पडला आहे.जिल्हा यंदा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. शासनाकडून जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता हैराण आहे.यावर्षी पाऊस कमी पडल्याने नदी, नाले, ओढेही दुधडी भरून वाहिले नाहित. त्यामुळे यंदा पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय-योजनांची मागणी होत आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण