शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

दोन धरणे, पंधरा तलाव जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:29 IST

जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील दोन धरणे व पंधरा लघुतलावांतील जलसाठा आता जोत्याखाली गेला आहे. केवळ इसापूर धरणात २६.२१ टक्के जलसाठा असून या एकाच धरणावर सगळी भिस्त आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्या दुष्काळझळांची तीव्रता जाणवत आहे. मात्र निवडणुकांतील राजकीय गोंगाटात जनतेला आपला आवाज कोणी ऐकणार नाही, याची जाणीव झाल्याने निमूटपणे हे सगळे सहन करण्याची वेळ आली आहे. टंचाईत पाण्याचा प्रश्न तर सगळीकडे बिकट आहे. मात्र निवडणुकीच्या कामाचे व आचारसंहितेचे कारण दाखवून कोरड पडलेल्या घशाने आवाज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेकडे कुणाचेही लक्ष नाही. शिवाय पुढारीही टंचाई आचारसंहितेच्या बाहेरची बाब असली तरीही यावर चकार शब्दही बोलत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम म्हणून गावोगावचे लोक पारावरच्या राजकीय गप्पांमध्येच टंचाईवर बोलत आहेत. इसापूर धरणात जिवंतसाठा २५२ दलघमी असून हे प्रमाण २६.२१ टक्के आहे. तर सध्या या धरणाची पाणीपाळी सुरू असल्याने विसर्गही होत आहे.येलदरी धरणात १0२ दलघमी मृतसाठा तर सिद्धेश्वर धरणात १६७.२५५ दलघमी मृतसाठा आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या तलावांपैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव हे जोत्याखाली गेले. तर सवड तलावात ३ टक्के जलसाठा आहे. सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, बाभूळगाव जोत्याखाली तर घोडदरी तलावात १ टक्के जलसाठा आहे. औंढा तालुक्यातील वाळकी, सुरेगाव, सेंदूरसना, काकडदाभा व केळी हे तलाव जोत्याखाली गेले. तर सुरेगाव ८ टक्के, औंढा ४१ टक्के, पुरजळ-२ टक्के, पिंपळदरी १९ टक्के पाणीसाठा आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी ८ टक्के, बोथी १0 टक्के, दांडेगाव ३ टक्के तर देवधरी जोत्याखाली आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावात १८ टक्के जलसाठा आहे. पूर्णा तालुक्यातील मरसूळ तलावही जोत्याखाली गेला आहे.याशिवाय पाच कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांत एकूण १८ टक्के जलसाठा आहे. यात सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा ५ टक्के, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १४ टक्के, परभणी तालुक्यातील राहाटी ६३ टक्के तर हिंगोली तालुक्यातील खेर्डा तलाव कोरडा पडला आहे.जिल्हा यंदा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. शासनाकडून जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यातच यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता हैराण आहे.यावर्षी पाऊस कमी पडल्याने नदी, नाले, ओढेही दुधडी भरून वाहिले नाहित. त्यामुळे यंदा पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय-योजनांची मागणी होत आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण