शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामविकास लाच घेण्यात टॉपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:57 IST

वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत एसीबीच्या पथकाने दणकेबाज एकूण २० कारवाया करून २८ आरोपींना पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत एसीबीच्या पथकाने दणकेबाज एकूण २० कारवाया करून २८ आरोपींना पकडले.शासकीय कार्यालये दिवसेंदिवस भ्रष्टÑाचाराने बरबटत चालले आहेत. एकही शासकीय विभाग दिसणार नाही की, त्या विभागात एसीबीच्या पथकाने कारवाई केली नाही. लाच देणे-घेणे गुन्हा आहे. असे असतानाही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा घेण्यासाठी नियमबाह्य आर्थिक व्यवहार केला जातो. जिल्हा भ्रष्टाचाराचे माहेरघर बनत चालल्याचे दिसून येत आहे. हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वर्षभरात एसीबीच्या पथकाने २० कारवाया केल्या करून विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिपाई व सभापती यांच्याविरूद्ध कारवाई केली. यात एकूण २ लाख ७ हजार ५०० रूपये एसीबीने जप्त केले. लाच देणे किंवा घेणे गुन्हाच आहे. शिवाय शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाते. त्यामुळे शासकीय कामांसाठी नागरिकांनी पैसे देऊ नयेत. सदर कामी पैशाच्या कारणावरून अधिकारी किंवा कर्मचारी अडवणूक करीत असतील तर तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क करावा, व याबाबत अधिकाºयांना माहिती द्यावी. तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ कॉल करावा. लोभी भ्रष्टाचारी व्यक्तीला धडा शिकवा, अन्याय सहन करणे म्हणजे भ्रष्टाचाराला मुक्त संमती देण्यासारखेच आहे. त्यामुळे भ्रष्टÑाचार मुक्तसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापूरकर यांनी केले आहे.लाचलुपत प्रतिबंधक विभागातर्फे वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जि. प. व पं. स. च्या ग्रामविकास विभागातील सवाधिक ८ कारवाया करण्यात आल्या आहेत. तर महसूल विभागात ३, पोलीस खात्यात ३, वन विभाग १, सामाजिक वनीकरण १ तसेच कृषि विभाग १, पाटबंधारे विभाग१, व इतर खासगी इसम एकूण २० कारवाया करण्यात आल्या आहेत. यात दोन कषि उत्पन्न समितीच्या सभापतींचाही समावेश असून २८ आरोपींना एसीबीच्या पथकाने पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.तक्रारीनंतर कारवाई करून भ्रष्टÑाचारी लोकसेवकास पकडल्यास त्याला न्यायालयातून शिक्षा होते. स्वत:चा वकील नेमावा लागत नाही, तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेऊन त्यास संरक्षणही दिले जाते.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारHingoli policeहिंगोली पोलीस