शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

...तर हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होईल; कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 1:01 PM

गोदावरी खोरे महामंडळाकडून आणला जात आहे प्रस्ताव

ठळक मुद्देनदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर परिणाम १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा प्रस्ताव

हिंगोली : तालुक्यातील खरबी येथून बोगद्याद्वारे कयाधू नदीचेपाणी पैनंगगा नदीत सोडण्याचा प्रस्ताव गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून आणला जात आहे. त्यास हिंगोली जिल्ह्याचा विरोध असून हा प्रकार म्हणजे हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे बैठकीला येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जात आहे. याद्वारे १0९ दलघमी पाणी कयाधूतून इसापूर धरणात सोडले जाणार आहे. इसापूर धरणाचा हिंगोली जिल्ह्याला काहीच फायदा होणार नाही. १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा आता महामंडळाचा प्रस्ताव आहे. त्याची किंमत ५१३ कोटी रुपये आहे. पूर्वी इसापूर व सापळी धरणाला १९६८ मध्ये एकत्रित मंजुरी दिली होती. तेव्हा ३५ कोटीत होणारा हा प्रकल्प २00५ मध्ये ३५५0 कोटींचा झाला होता. आता तो कोणत्याही परिस्थितीत रास्त नाही. मात्र कयाधू नदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर त्याचा परिणाम होईल. हे पात्र कोरडे होईल. या भागातील नियोजित बंधाऱ्यांना पाणी मिळणार नाही. आधीच पाच उच्च पातळी बंधारे प्रस्तावित असून हिंगोली जिल्ह्याचा वेगळा अनुशेष मंजूर झाला तरीही त्यांचा प्रश्न सुटला नाही.

यापूर्वी मेंढेगिरी लवादानेही जिल्ह्यासाठी १0८ दलघमी पाणी आरक्षित केले असून त्याचेही कोणतेच नियोजन महामंडळाने केलेले नाही. मात्र हा नवा प्रस्ताव आणून महामंडळ हिंगोली जिल्ह्याच्या विरोधात भूमिका घेत असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  

टॅग्स :riverनदीHingoliहिंगोलीWaterपाणी