शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

महालिंगी येथील ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा, चार महिन्यांपासून मिळत नाही ग्रामस्थांना पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 9:10 PM

Hingoli News: दाभडी ग्रामपंचायतअंतर्गत महालिंगी येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल चार किलोमीटरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी सांगूनही लक्ष न दिल्याने अखेर ग्रामस्थांनी २५ मार्च रोजी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला. 

- विश्वास साळुंके वारंगा फाटा (जि. हिंगोली) - दाभडी ग्रामपंचायतअंतर्गत महालिंगी येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल चार किलोमीटरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी सांगूनही लक्ष न दिल्याने अखेर ग्रामस्थांनी २५ मार्च रोजी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढला. 

कळमनुरी तालुक्यातील दाभडी ग्रामपंचायतअंतर्गत महालिंगी येथे मागील चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. परिणामी ग्रामस्थांना जवळपास पाच किलोमीटर अंतरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वेळोवेळी संबंधित विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगूनही कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी  २५ मार्च रोजी ग्रामपंचायतवर घागरमोर्चा काढला.

गावातील सर्व महिला,पुरुष हे पाण्याची भांडी घेऊन ग्रामपंचायतसमोर सकाळी ते दोन  वाजेपर्यंत उन्हात ठाण मांडून बसले होते. यापूर्वी जिल्हा प्रशासनाला  ग्रामस्थांनी घागर मोर्चा व उपोषणा संदर्भात २४ मार्च रोजी निवेदन दिले होते. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्या बाबत म्हटले होते.  तसेच सदरील बाब अनेकवेळा गटविकास अधिकारी कळमनुरी यांच्या निदर्शनास आणून  देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाण्याची तात्पुरती व्यवस्था केली... ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढल्यानंतर अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ ग्रामस्थांसाठी तात्पुरती टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्याचे  ग्रामस्थ गुणाजी चाकोते यांनी सांगितले. जर नळाद्वारे किंवा टँकरद्वारे पाणी सुरळीत नाही मिळाले तर ग्रामपंचायतीसमोरच  उपोषण करणार असल्याचेही  चाकोते यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोली