शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:41 IST

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करीत आहेत.

डोंगरकडा (जि.हिंगोली) : आश्वासन देऊन देखील संपूर्ण कर्जमाफी न देणारे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. पण, तुमच्यातही नांगर फिरविण्याची हिंमत आहे, हे लक्षात ठेवा आणि सरकारवर नांगर फिरवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे शेतकऱ्यांना केले.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करीत आहेत. ७ नोव्हेंबर रोजी त्यांनी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, हे सरकार रजाकारापेक्षाही वाईट वागत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही. दगाबाज सरकारला तुम्ही दगा द्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि लोकशाहीतील मत चोरी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारला आव्हान दिले आहे. जे मी घरी बसून केले ते त्यांनी लोकांमध्ये फिरवून करावे. भाजप सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असेच सांगितले होते, पण आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू, अशी भाषा सरकार वापरत आहे. त्यामुळे तुम्हीही असेच सांगा की योग्य वेळी आम्ही मतदान करू, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

एकजुटीने धडा शिकवामत चोरीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दुबार आणि तीबार मतदारांची नोंद झाल्याचे सांगून मत चोरी करून हे सरकार सत्तेत आल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, जे लोक मत चोरी करून आले आहेत आणि दगाबाजी करून कारभार करत आहेत, त्यांना शेतकऱ्यांनी एकजुटीने धडा शिकवावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.  

यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, बबनराव थोरात, खासदार नागेश आष्टीकर, हिंगोली जिल्हाप्रमुख गोपू पाटील, संदेश देशमुख, शेतकरी नेते पराग अडकिणे, बाळासाहेब गावंडे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या समस्यांच्या पाढा वाचला.

English
हिंदी सारांश
Web Title : Betrayed by government, revolt! Thackeray urges farmers to overthrow them.

Web Summary : Uddhav Thackeray accuses the government of deceiving farmers on loan waivers. He urged farmers to unite and overthrow the 'betrayer government' due to unfulfilled promises and alleged electoral fraud, demanding complete loan waivers.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्र