शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

हिंगोलीत महायुतीतील टेंशन दूर; भाजपला बंड शमविण्यात अखेर यश, तिघांचीही माघार

By विजय पाटील | Updated: April 8, 2024 14:14 IST

भाजपच्या तिघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

हिंगोली : भाजपचे नेते तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, आ.श्रीकांत भारतीय यांच्या शिष्टमंडळाने लोकसभेतील भाजप बंडखोरांची घेतलेली भेट फलदायी ठरली आहे. तीनही बंडखोरांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिंगोली येथे भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुटकुळे म्हणाले, ही जागा लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र ती मित्रपक्षाला गेली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असल्या तरीही देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपच्या तिघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

तर भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रामदास पाटील म्हणाले, केंद्रातील व राज्यातील मंत्र्यांनी येथे येवून माझ्या भावना जाणून घेतल्या हेच माझ्यासाठी तिकीट आहे. माझ्या समर्थकांच्या नव्हे, पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मी उमेदवारी दाखल केली होती. मात्र वरिष्ठांच्या शब्दाचा आदर करून माघार घेत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, बाबाराव बांगर, मिलींद यंबल, अशोक ठेंगल, उमेश नागरे, के.के.शिंदे, हमिद प्यारेवाले आदी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४