शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

उसनवारीवर पाणी घेऊन शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:23 IST

१५0 म्हशी-वघारींचा संसार जीवापाड जपण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

ठळक मुद्देदुष्काळामुळे दुग्धव्यवसाय अडचणीतचारा-पाण्याचा खर्च कैक पटींनी वाढला

- विजय पाटील

हिंगोली : मुलांप्रमाणेच गुरांनाही जिवापाड जपणारे शेतकरी अजून असल्याने तोट्याचा म्हटला जात असला तरी शेतीव्यवसाय सुरू आहे. हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथील किशनराव मांडगे यांनी दुग्धव्यवसायासाठी उसनवारीवर पाणी घेऊन म्हशींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जलतरण तलाव भरला.

यंदा हिंगोलीत तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. गुरांचे चारापाणी करणे अवघड बनले आहे. जलस्त्रोत झपाट्याने आटत आहेत. मांडगे यांचीही १00 फूट खोल विहीर आटली. कयाधू नदीत घेतलेला एक बोअर अर्धा तास चालतो. त्यात म्हशींची तहानही भागत नाही. मग त्यांचा जलतरण तलाव भरण्याचा प्रश्न होता. शेजारच्या एका शेतकऱ्याकडून पाणी घेऊन ही निकड भागविली. दिवसा चारा-पाणी केल्यानंतर दुपारी या तलावात सोडायचे. सायंकाळी शेडमध्येच तुषाराप्रमाणे थंड फवारे अंगावर पडणारी यंत्रणा आहे. ती मध्यरात्रीपर्यंत चालवावी लागते. तिला कमी पाणी लागते. दर दोन ते तीन दिवसांनी तरण तलावातील पाणी बदलावे लागते. हे पाणी शेडमधील मलमुत्रासह तेथे आलेले असल्याने ते चारा पिकांना गाळून सोडले जाते. त्यामुळे पीकही चांगले येते. शिवाय म्हशी तलावातून धुवून बाहेर निघण्यासाठीच्या खास व्यवस्थेला रोज पाणी लागते. हजारो लिटर पाण्याची ही गरज भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ही व्यवस्था न केल्यास म्हशींना उन्हाळ्यात तग धरणेच कठीण असते. प्रसंगी त्यांच्या जिवाचीही भीती. त्यामुळे म्हशींना जपायचे व दुग्धव्यवसाय करायचा तर एखादे वर्ष असे म्हणून मांडगे यांनी संगोपनात कुठलीच कसर ठेवली नाही. याशिवाय कडबा कुट्टी, कडबा व दूध वाहतुकीची वाहने, वीज नसल्यास पर्याय म्हणून दोन जनरेटर, दूध साठविण्यास फ्रीजर तसेच लाखोंचा खर्च करून उभारलेले शेड, जलतरण तलाव व म्हशींना फिरविण्यासाठीचे संरक्षक भिंतीसह मैदान या वेगळ्याच बाबी. व्यवसाय करताना हळूहळू हे निर्माण केली तरीही तेही सांभाळावेच लागते. त्याचबरोबर सात ते आठ सालदारही शेतीसह या कामावर जुंपलेले असतात. घरचे किशनराव मांडगे यांच्या चार मुलांचे कुटुंबही इतर कामे सांभाळून यात राबते. तिसरी पिढीही झटत आहे. यात सर्वाधिक वाटा बाजीराव मांडगे यांचा. तर अशोक, सुभाष मांडगे हेही शेतीतील इतर कामांत मदत करतात. सर्वांत थोरले रामेश्वर हे मार्गदर्शन व इतर व्यवहार सांभाळतात.

१५0 म्हशी-वघारींचा संसार मांडगे यांच्याकडे म्हशी व वघारी मिळून १५0 आहेत. यापैकी म्हशी ९0. त्यातील ७५ टक्के दुभत्या. मात्र पाण्याअभावी बेताचाच चारा मिळाला. येलदरी येथील २५ एकर ऊस विकत घेतला. आतापर्यंत ३00 टन ऊस खाद्य म्हणून लागला. ३ हजार रुपये प्रतिटन त्याचा भाव आहे. सोबतीला तीन हजार रुपये क्विंटलचे ढेप आदी पशुखाद्य. दरवर्षीपेक्षा यंदा दरही वाढले. घरचा चाराही नाही. त्यामुळे हरभरा, टाळकीचे कुटारही विकतच घेतले.

खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ अवघडबाजीराव मांडगे म्हणाले, वडिलांनी अडीच एकर जमीन व एका म्हशीवर दुग्धव्यवसाय सुरू केला. आज कुटुंबाची ९५ एकर जमीन आहे. दीडशे म्हशी आहेत. कुठल्याही अनुदानावर नव्हे, तर कुटुंबाच्या मेहनतीवर हे उभे राहिले. यामुळेच आमची ओळख निर्माण झाली. त्यामुळे हे पशुधन जिवापाड जपलेच पाहिजे. यंदा दुष्काळ नसता तर पाचशे लिटर दूध विक्री करता आली असते. मात्र अशाही परिस्थितीत साडेतीनशे लिटरच्या आसपास दूध मिळते. खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ अवघड झाला. मात्र या पशुधनासाठी जे करतोय ते कमीच आहे. कामाला असलेली माणसंही जपायची आहेत. एखादे वर्ष असेही. म्हणून कुणापुढे हात थोडी पसरता येणार आहे. यंदा दुष्काळामुळे आपल्याच भागात अनेक ठिकाणी गुरांना चाराही मिळत नाही. त्यांच्या पशुधनाचे हाल होत आहेत. ते बघवत नाही. शासनाने त्यांच्यासाठी तरी चारा छावण्यांची सोय केली पाहिजे. 

पशुधन टिकवावे लागेल पशुधनामुळेच शेतीत प्रगती करता येते. त्यांच्या मलमुत्रामुळे शेतीचे उत्पादन चांगले येते. शिवाय रसायनमुक्त असते. दुग्धव्यवसायातून जोडधंदाही होतो. चांगले करायचा प्रयत्न केला. यश मिळत गेले. आता हे पशुधन टिकवावेच लागेल. दुष्काळात माणसांना कुठेही जाता येईल. या मुक्या प्राण्यांची तर आपणच काळजी घेतली पाहिजे. - किशनराव मांडगे 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रmilkदूधdroughtदुष्काळ