शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन आवक मंदच, हमी केंद्रही ओसच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:14 IST

यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहेरचे दरच वाढल्याने तेही ओस पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहेरचे दरच वाढल्याने तेही ओस पडले आहेत.मागील काही वर्षांपासून शेतीमालाला भाव नसल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येत आहे. हमीभावापेक्षाही कमी दराने मोंढ्यात मालाची खरेदी होत असल्याची ओरड करून शेतकरी नाफेडच्या हमीभाव केंद्रावर गर्दी करीत होते. मात्र शेतकऱ्यांना त्याचा अनुभव फारसा चांगला आला नाही. यात मालाची आॅनलाईन नोंदणी, त्यानंतर माल विक्रीसाठी प्रतीक्षा, त्यानंतर धनादेशासाठी चकरा असा तीन ते चार महिन्यांचा काळ जात होता. त्यामुळे या केंद्राकडे पाठ फिरवून अनेकांनी मोंढ्यात कमी दराने आपला माल विकणे पसंत केले होते. यंदा मात्र दुष्काळामुळे चित्र बदलले आहे. हरभºयाचे दर तर आता पुढील हंगाम येण्यापूर्वीच वधारलेले आहेत. सोयाबीनही हमीभावापेक्षा जास्त दराने विकले जात आहे. ३ हजार ५00 रुपयांपर्यंतचा दर मिळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आॅईल मिल, बियाणे महामंडळ व व्यापारी अशा तिन्हींकडून मागणी असल्याने शेतकºयांना अजून दरवाढीची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी काहीकाळ वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. तूर्तही शेतकरी आपली तात्पुरती गरज भागविण्याइतकाच माल मोंढ्यात आणत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या दिवसांत रोज जवळपास आठ हजार क्विंटलपर्यंत येणारा माल आता दीड ते दोन हजार क्विंटलांवर आला आहे. बहुतांश भागात दुष्काळामुळे उताराही घटलेला आहे. यामुळे यंदा व्यापाºयांतही स्पर्धा व निराशा दोन्ही असल्याचे चित्र दिसून येत आहे.यंदा हमीभाव केंद्रांवर माल देणाºया शेतकºयांना आठ दिवसांत रक्कम मिळेल, अशी प्रणाली शासनाने निर्माण केली. मात्र तेथील दरच कमी असल्याने शेतकरी थेट मोंढ्याकडे वळला आहे. त्यामुळे नोंदणी केलेला मालही हमीभाव केंद्रावर जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अचानकच ही परिस्थिती बदलल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्ड