शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

अभ्यासाला बसतोय, पण मनच लागत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

हिंगोली: अभ्यासाला बसतोय, परंतु अभ्यासात मनच लागत नाही, अशा तक्रारी किशोरवयीन मुलांच्या असून, २०१९-२० या वर्षात हा आरोग्यविषयक तक्रारींचा ...

हिंगोली: अभ्यासाला बसतोय, परंतु अभ्यासात मनच लागत नाही, अशा तक्रारी किशोरवयीन मुलांच्या असून, २०१९-२० या वर्षात हा आरोग्यविषयक तक्रारींचा (समस्या) आकडा ९ हजार ६०० वर पोहोचलेला पहायला मिळत आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात २०१४ या वर्षापासून काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो असून त्यात हिंगोली जिल्ह्यााचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी ९ हजार ६०० तक्रारी या आरोग्यविषयक होत्या. यामध्ये १० ते १९ वयोगटातील मुला-मुलींचा समावेश होता. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत ३ हजार ८४० मुलांच्या तर ५ हजार ७६० या मुलींच्या तक्रारी आल्या होत्या. आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी १६ समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ज्या मुला-मुलींनी तक्रारी केल्या आहेत त्यांच्या तक्रारी जाणून त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन करत त्यावर मार्ग काढून दिला जातो. लॉकडाऊन काळात या तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मार्च २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. एप्रिल ते जुलै दरम्यान हा कार्यक्रम बंद होता. शाळा-महाविद्यालयांनाही सुटी होती. त्यानंतर शहरातील नागरी आरोग्य केंद्रात तसेच अंगणवाडी अंतर्गत आलेल्या तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लॉकडाऊन काळात जवळपास २५ ते ३० कार्यक्रम या कार्यक्रमातंर्गत घेण्यात आले.

२०२० मध्ये आलेल्या तक्रारींची संख्या-९६००

३८४० मुुलांच्या तक्रारी

५७६० मुलींच्या तक्रारी

मोबाईलशिवाय करमत नाही...

मोबाईलशिवाय करमत नाही, काय करू अभ्यासात मन लागत नाही, डोके दुखते, पोट दुखते अशा एक ना अनेक समस्या मुला-मुलींच्या असतात. बहुतांश वेळा मुले-मुली दिवस-दिवस मोबाईलवर असतात. यामुळे मोबाईलचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो. कधी-कधी डोकेही जड पडते. काही सुचत नाही. तेव्हा पालकांनी मुला-मुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बॉक्स

आरोग्य विषयक असतात तक्रारी

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यकमात जास्त करुन आरोग्य विषयकच तक्रारी जास्त आलेल्या होत्या. अशावेळी मुले-मुलींची तक्रार जाणून घेऊन त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन केले आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये मुला-मुलींना समुपदेशन केले आहे. किशोरवयीन मुला-मुलींसमवेत पालकांनाही समुपदेशन करण्यात आलेले आहे.

बॉक्स

लाॅकडाऊन नंतर...

मार्च महिन्यात कोरोना आजाराने डोके वर काढले होते. त्यानंतर एप्रिल ते जुलै या दरम्यान सर्वत्र व्यवहार बंद होते. बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले होते. यानंतर अनेक मुले-मुलींच्या तक्रारी आल्या. प्रत्येकाच्या घरी जाणे तर शक्य नसते. म्हणून आम्ही शहरातील नागरी आरोग्य केंद्रात या सर्वांच्या तक्रारींचे निरसन करुन योग्य प्रकारे समुपदेशन केले, अशी माहिती जिल्हा समन्वयक अनुराधा पतरोड यांनी दिली.