शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

अभ्यासाला बसतोय, पण मनच लागत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

हिंगोली: अभ्यासाला बसतोय, परंतु अभ्यासात मनच लागत नाही, अशा तक्रारी किशोरवयीन मुलांच्या असून, २०१९-२० या वर्षात हा आरोग्यविषयक तक्रारींचा ...

हिंगोली: अभ्यासाला बसतोय, परंतु अभ्यासात मनच लागत नाही, अशा तक्रारी किशोरवयीन मुलांच्या असून, २०१९-२० या वर्षात हा आरोग्यविषयक तक्रारींचा (समस्या) आकडा ९ हजार ६०० वर पोहोचलेला पहायला मिळत आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात २०१४ या वर्षापासून काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो असून त्यात हिंगोली जिल्ह्यााचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी ९ हजार ६०० तक्रारी या आरोग्यविषयक होत्या. यामध्ये १० ते १९ वयोगटातील मुला-मुलींचा समावेश होता. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत ३ हजार ८४० मुलांच्या तर ५ हजार ७६० या मुलींच्या तक्रारी आल्या होत्या. आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी १६ समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ज्या मुला-मुलींनी तक्रारी केल्या आहेत त्यांच्या तक्रारी जाणून त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन करत त्यावर मार्ग काढून दिला जातो. लॉकडाऊन काळात या तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मार्च २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. एप्रिल ते जुलै दरम्यान हा कार्यक्रम बंद होता. शाळा-महाविद्यालयांनाही सुटी होती. त्यानंतर शहरातील नागरी आरोग्य केंद्रात तसेच अंगणवाडी अंतर्गत आलेल्या तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लॉकडाऊन काळात जवळपास २५ ते ३० कार्यक्रम या कार्यक्रमातंर्गत घेण्यात आले.

२०२० मध्ये आलेल्या तक्रारींची संख्या-९६००

३८४० मुुलांच्या तक्रारी

५७६० मुलींच्या तक्रारी

मोबाईलशिवाय करमत नाही...

मोबाईलशिवाय करमत नाही, काय करू अभ्यासात मन लागत नाही, डोके दुखते, पोट दुखते अशा एक ना अनेक समस्या मुला-मुलींच्या असतात. बहुतांश वेळा मुले-मुली दिवस-दिवस मोबाईलवर असतात. यामुळे मोबाईलचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो. कधी-कधी डोकेही जड पडते. काही सुचत नाही. तेव्हा पालकांनी मुला-मुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बॉक्स

आरोग्य विषयक असतात तक्रारी

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यकमात जास्त करुन आरोग्य विषयकच तक्रारी जास्त आलेल्या होत्या. अशावेळी मुले-मुलींची तक्रार जाणून घेऊन त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन केले आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये मुला-मुलींना समुपदेशन केले आहे. किशोरवयीन मुला-मुलींसमवेत पालकांनाही समुपदेशन करण्यात आलेले आहे.

बॉक्स

लाॅकडाऊन नंतर...

मार्च महिन्यात कोरोना आजाराने डोके वर काढले होते. त्यानंतर एप्रिल ते जुलै या दरम्यान सर्वत्र व्यवहार बंद होते. बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले होते. यानंतर अनेक मुले-मुलींच्या तक्रारी आल्या. प्रत्येकाच्या घरी जाणे तर शक्य नसते. म्हणून आम्ही शहरातील नागरी आरोग्य केंद्रात या सर्वांच्या तक्रारींचे निरसन करुन योग्य प्रकारे समुपदेशन केले, अशी माहिती जिल्हा समन्वयक अनुराधा पतरोड यांनी दिली.