शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेवाळा गावाला भिडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:24 AM

आखाडा बाळापूर - हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. शेवाळा येथे पूरपरिस्थिती गंभीर आहे. पार शेवाळा गावापर्यंत पाणी भिडले आहे. येथे चौघेजण पुरात अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करून सर्वांर्ना देवजना येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर - हदगाव मार्गावरील शेवाळा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. शेवाळा येथे पूरपरिस्थिती गंभीर आहे. पार शेवाळा गावापर्यंत पाणी भिडले आहे. येथे चौघेजण पुरात अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करून सर्वांर्ना देवजना येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.बाळापुर ते बोल्डा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे तोही मार्ग बंद पडला आहे. आखाडा बाळापूर परिसरातील सोडेगाव, सालेगाव, चाफनाथ, शेवाळा, डोंगरगाव पूल, सापळी, कसबे धावंडा, कोंढूर, डिग्रस, चिखली, कान्हेगाव, पिंपरी, येगाव या परिसरामध्ये पुराच्या पाण्याने प्रचंड हैदोस माजवला आहे. या परिसरातील ४० टक्के शेतीमध्ये पाणी घुसले असून यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तहसीलदारांची पाहणीमहसूल प्रशासन या घटनेवर बारीक लक्ष ठेवून असून ठिकठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पाहणी केली असून नुकसानीचा अंदाज पूर ओसरल्यानंतर कळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.कवडी-येगाव रस्ता गेला वाहूनकळमनुरी तालुक्यातील येगावं- कवडी या भागात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले झाले आहे. येगाव ते कवडी या दोन गावांना जोडणारा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेला रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला. त्यामुळे दोन गावातील संपर्क तुटला आहे. तसेच दोन्ही गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून माती वाहून गेली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस