मोफत प्रवेशासाठी ४७८ बालकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST2021-04-17T04:29:27+5:302021-04-17T04:29:27+5:30
हिंगोली जिल्ह्यातून मोफत प्रवेशासाठी ५३० जागांसाठी ९८७ अर्ज आले होते. या जागांवर प्रवेश देण्यासाठी ८ एप्रिल रोजी पहिली लॉटरी ...

मोफत प्रवेशासाठी ४७८ बालकांची निवड
हिंगोली जिल्ह्यातून मोफत प्रवेशासाठी ५३० जागांसाठी ९८७ अर्ज आले होते. या जागांवर प्रवेश देण्यासाठी ८ एप्रिल रोजी पहिली लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीमध्ये जिल्ह्यातील ४७८ बालकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएस संदेश पाठविला जात आहे. पालकांनी केवळ एसएमएस संदेशावरच अवलंबून न राहता आर.टी.ई. पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक तपासून पहावा, त्यावर प्रवेश घेण्याची तारीख दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. पडताळणी समितीकडे जाताना
पालकांनी प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे, त्यांच्या छायांकित प्रती, आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि ऑलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे, पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये, जाताना पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत, तसेच प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये, त्यांच्याकरिता आरटीई पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जातील, असेही सांगण्यात आले.