शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर; काँग्रेसमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 15:27 IST

Pragya Satav: प्रज्ञा सातव यांना शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर संधी मिळणार आहे. तीन ते साडेतीन वर्षांचा काळ यामुळे मिळणार आहे.

हिंगोली : जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलेले नेतृत्व दिवंगत खा.राजीव सातव यांच्या निधनाने मरगळलेल्या काँग्रेसला प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषद उमेदवारीने (Pragya Satav's candidature for Legislative Council announced) पुन्हा चैतन्य प्राप्त झाले आहे. जिल्ह्यावर वरचष्मा असलेल्या पक्षाला नाजूक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे हे पद उपयोगी पडणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात मोदी लाटेतही काँग्रेसचा प्रभाव सिद्ध करून राजीव सातव यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याची चुणूक दाखविली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील काँग्रेसकडे असे कोणतेच महत्त्वाचे पद उरले नव्हते. पालकमंत्री म्हणून वर्षाताई गायकवाड यांचा तेवढा आधार जिल्ह्याला होता. मात्र सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी पक्षकार्यात झोकून दिले होते. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही काँग्रेसप्रती असलेली निष्ठा व कार्यकर्त्यांशी असलेली सातव घराण्याची नाळ तुटू नये, यासाठी त्या प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते. पक्षाने दिलेल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेवून पक्षवाढीसाठीही त्यांनी प्रयत्न केले.

पक्ष सदस्य नोंदणी अभियानाला स्वत: सुरुवात करून दिली. मात्र जिल्ह्यात काँग्रेसचे हात अधिक बळकट करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. शिवाय सातव यांच्या निधनानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही सातव कुटुंबियांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, असे सांगितले होते. त्या आश्वासनाची पूर्तता या विधान परिषद उमेदवारीच्या रुपाने होत असल्याचे दिसून येत आहे. प्रज्ञा सातव यांना शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर संधी मिळणार आहे. तीन ते साडेतीन वर्षांचा काळ यामुळे मिळणार आहे. त्यात पक्षासाठी काम करताना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हे पद उपयोगी ठरणार आहे.

हिंगोलीत, कळमनुरीत जल्लोषप्रज्ञा सातव यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर केल्याचे मुकुल वासनिक यांचे पत्र प्राप्त होताच हिंगोली व कळमनुरीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हिंगोलीत सुरेश सराफ, नेहालभैय्या, माबूद बागवान, शयमराव जगताप, मिलिंद उबाळे, अनिल नेनवाणी, जुबेरमामू, बांगर, मुजीब कुरेशी, आरेफ लाला, माणिक देशमुख, आदींच्या उपस्थितीत फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक