शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:42 IST

हिंगोली : कोरोना बाधितांची संख्या पाहता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तशी कमीच आहे. आजघडीला हिंगोली जिल्ह्याची ट्रेसिंग ही एका बाधितामागे २३ ...

हिंगोली : कोरोना बाधितांची संख्या पाहता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तशी कमीच आहे. आजघडीला हिंगोली जिल्ह्याची ट्रेसिंग ही एका बाधितामागे २३ अशी आहे. सद्यस्थितीत कोरोनाची संख्या लक्षात घेऊन ट्रेसिंग वाढविण्याची गरज आहे.

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण हे एका आकड्यावरून दोन आकड्यांवर येऊन ठेपले आहेत. जिल्हा प्रशासन नागरिकांची काळजी घेण्यात तत्पर असले तरी बाधितांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. २३ फेब्रुवारी रोजी ३८ तर २४ फेब्रुवारी रोजी २७ रुग्ण बाधित निघाले आहेत. सद्यस्थितीत एका बाधितामागे २० ते २५ लोकांना ट्रेस केले जाते. हा आकडा यापुढे जास्तीत जास्त कसा केला जाईल यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आजपर्यंत ८९ हजार ३०५ जण तपासले (ट्रेस) गेले आहेत. यामध्ये तपासणीअंती हायरिक्स २७ हजार ९३० तर लोरिक्स ६१ हजार ४०२ निघाले आहेत.

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात ते सकाळी सात अशी संचारबंदी लागू केली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण ३ हजार ९८१ आहेत. यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ७६४ असून जिल्हा रुग्णालयात आजमितीस १५८ जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ५९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आता ट्रेस जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून चालू आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर वेगवेगळी टीम नेमली आहे, अशी माहिती जिल्हा साथरोगतज्ज्ञ डॉ. इनायततुल्ला खान यांनी दिली.

नागरिकांना आवाहन करूनही ते काळजी घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालय नागरिकांना काम असल्याशिवाय बाहेर पडू नका, विनामास्क फिरू नका, असे वारंवार सांगत असून तशा सूचनाही देत आहे. परंतु, नागरिक सूचनांकडे कानाडोळा करीत आहेत. परिणामी रुग्ण वाढत आहेत.

-डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

प्रतिक्रिया

बाधित झालो तेव्हा बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. घरचेही माझ्यापासून दूरच गेले होते. जेवणही एका वेगळ्या ताटात दिले जात होते. पाण्यासाठी वेगळी बॉटल दिली होती. कोरोनाने एक मात्र चांगले केले ते म्हणजे स्वच्छ राहण्याची शिकवण दिली.

कोरोना बाधित झाला म्हणजे तो दूरचा पाहुणा अशीच त्याची ओळख पटू लागली होती. कोरोना बाधित झाल्याचे कळताच मला अनेकांनी भेटणे तर सोडा साधा मोबाईल करणेही सोडून दिले होते. मी मोठा गुन्हा केला की काय, अशी मानसिकता लोकांमध्ये निर्माण झाली होती.

कोरोना मार्च महिन्यात दाखल झाला. यावेळी गाफील राहिल्यामुळे चौथ्या आठवड्यातच कोरोनाने मला पछाडले. मग काय सर्वत्र मला कोरोना झाला अशी बातमी पसरली. त्यानंतर पंधरा-वीस दिवस तर कोणीच जवळ येत नव्हते. घरचेही दूरच राहिले होते.