शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:42 IST

हिंगोली : कोरोना बाधितांची संख्या पाहता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तशी कमीच आहे. आजघडीला हिंगोली जिल्ह्याची ट्रेसिंग ही एका बाधितामागे २३ ...

हिंगोली : कोरोना बाधितांची संख्या पाहता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तशी कमीच आहे. आजघडीला हिंगोली जिल्ह्याची ट्रेसिंग ही एका बाधितामागे २३ अशी आहे. सद्यस्थितीत कोरोनाची संख्या लक्षात घेऊन ट्रेसिंग वाढविण्याची गरज आहे.

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण हे एका आकड्यावरून दोन आकड्यांवर येऊन ठेपले आहेत. जिल्हा प्रशासन नागरिकांची काळजी घेण्यात तत्पर असले तरी बाधितांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. २३ फेब्रुवारी रोजी ३८ तर २४ फेब्रुवारी रोजी २७ रुग्ण बाधित निघाले आहेत. सद्यस्थितीत एका बाधितामागे २० ते २५ लोकांना ट्रेस केले जाते. हा आकडा यापुढे जास्तीत जास्त कसा केला जाईल यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आजपर्यंत ८९ हजार ३०५ जण तपासले (ट्रेस) गेले आहेत. यामध्ये तपासणीअंती हायरिक्स २७ हजार ९३० तर लोरिक्स ६१ हजार ४०२ निघाले आहेत.

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात ते सकाळी सात अशी संचारबंदी लागू केली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण ३ हजार ९८१ आहेत. यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ७६४ असून जिल्हा रुग्णालयात आजमितीस १५८ जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ५९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आता ट्रेस जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून चालू आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर वेगवेगळी टीम नेमली आहे, अशी माहिती जिल्हा साथरोगतज्ज्ञ डॉ. इनायततुल्ला खान यांनी दिली.

नागरिकांना आवाहन करूनही ते काळजी घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालय नागरिकांना काम असल्याशिवाय बाहेर पडू नका, विनामास्क फिरू नका, असे वारंवार सांगत असून तशा सूचनाही देत आहे. परंतु, नागरिक सूचनांकडे कानाडोळा करीत आहेत. परिणामी रुग्ण वाढत आहेत.

-डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

प्रतिक्रिया

बाधित झालो तेव्हा बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. घरचेही माझ्यापासून दूरच गेले होते. जेवणही एका वेगळ्या ताटात दिले जात होते. पाण्यासाठी वेगळी बॉटल दिली होती. कोरोनाने एक मात्र चांगले केले ते म्हणजे स्वच्छ राहण्याची शिकवण दिली.

कोरोना बाधित झाला म्हणजे तो दूरचा पाहुणा अशीच त्याची ओळख पटू लागली होती. कोरोना बाधित झाल्याचे कळताच मला अनेकांनी भेटणे तर सोडा साधा मोबाईल करणेही सोडून दिले होते. मी मोठा गुन्हा केला की काय, अशी मानसिकता लोकांमध्ये निर्माण झाली होती.

कोरोना मार्च महिन्यात दाखल झाला. यावेळी गाफील राहिल्यामुळे चौथ्या आठवड्यातच कोरोनाने मला पछाडले. मग काय सर्वत्र मला कोरोना झाला अशी बातमी पसरली. त्यानंतर पंधरा-वीस दिवस तर कोणीच जवळ येत नव्हते. घरचेही दूरच राहिले होते.