शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रानडुकराच्या हल्ल्यात बैलजोडी बिथरून पडली विहिरीत; एक बैल ठार तर दुसऱ्याचे चारही पाय मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 7:42 PM

वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथे शेतात वखरणी करताना समोर अचानक रानडुकराचा कळप आल्याने बैलजोडी बिथरून  विहिरीत पडली.

हिंगोली : वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथे शेतात वखरणी करताना समोर अचानक रानडुकराचा कळप आल्याने बैलजोडी बिथरून  विहिरीत पडली. यात एका बैलाचा मृत्यू तर दुसऱ्या बैलाचे चारही पाय मोडले आहेत. यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यावर काळाने मोठे संकट उभे केले आहे. 

वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील शेतकरी सचिन दिगंबराव सावंत हे आपल्या शेतात आज  बैलजोडीच्या साह्याने वखरणी करीत होते. दरम्यान, धुऱ्यावर कलावणीच्या वेळी रानडुकराचा कळप अचानक बैलांच्या समोर आल्याने बैल बुजाडले आणि जवळच असलेल्या विहिरीत वखरासह पडले. विहीर जवळपास ६० ते ७० फूट असून पाणीच नसल्याने एक बैल ठार झाला. तर दुसऱ्या बैलाचे चारही पाय मोडले.  सुदैवाने यात सावंत यांना कसलीही इजा झाली नाही. मात्र, अवघ्या काही दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपल्याने सावंत यांच्या समोर पेरणीचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे परिसरात रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा बंदोबस्त करण्याच्या मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे काही दिवसांपूर्वीच केली आहे. 

नुकसान भरपाई द्यावी परिसरातील रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे अनेकदा केली. मात्र त्यांनी लक्षच दिले नाही. आता तर बैलजोडीही गेली आहे. निदान नुकसान भरपाई तरी देण्याची मागणी दिगंबरराव सावंत यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र