शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 28, 2022 19:08 IST

यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके आदी घोषणाही देण्यात आल्या.

हिंगोली : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी या व  इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने २८ ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके आदी घोषणाही देण्यात आल्या.

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी,  शिक्षण व उद्योगासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना सिविल स्कोरची अट लावू नये, पीकविमा द्यावा, शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, जिल्हा परिषद भरतीला मिळालेले स्टे उठवावा, तत्काळ पोलीस व सैन्य भरती घ्यावी, यासह इतर मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला मोर्चा महात्मा गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी आमदार नवघरे, विधान परिषद सदस्या सातव, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. त्यांनी केंद्र, राज्य शासनाच्या धोरणाविरूद्ध सडकून टिका केली. त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

आंदोलक-पोलिसांत झटापट कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरही पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आला असता आंदोलकांनी प्रवेशद्वार लोटत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली.  यावेळी पोलिसांना दंडूका उगारावा लागला. पोलीस व आमदार नवघरे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलक शांत झाले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीdroughtदुष्काळ