शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

उन्हाळी सुट्यांतही पोषण आहार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:57 PM

जिल्ह्यातील शाळांना २ मे पासून सुट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्यांमध्येही पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांतील शाळेत पोषण आहार दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील शाळांना २ मे पासून सुट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्यांमध्येही पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांतील शाळेत पोषण आहार दिला जाणार आहे.हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये उन्हाळी सुट्यांतही शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक व माध्यमिक तसेच अनुदानित विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक, सैनिकी शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु यंदा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याने टंचाईग्रस्त भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविला जाणार आहे. सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असून संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना तसेच पत्रही पाठविण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात येणाºया सर्व शाळेत पोषण आहार वाटप करण्यात यावा, तसेच एकही बालक पोषक आहारपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी गट शिक्षणाधिकाºयांना दिल्या आहेत. शाळा सुरू होईर्यंत म्हणजेच १७ जून २०१९ पर्यंत शालेय पोषण आहार शिजविण्यात येणार आहे. संबधित शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या वेळेत शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा, असेही कळविण्यात आले आहे. एकंदरीत सध्या तरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थी पोषण आहार योजनेचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सुट्यांमध्ये नातेवाईकांच्या गावी जातात. किंवा कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रHealthआरोग्य