शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गशाळा पोहोचली सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

हिंगोली : निसर्गशाळेच्या सहाव्या आणि सातव्या तुकडीचे उद्घाटन हभप अविनाश महाराज भारती यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी महाराष्ट्रातील ३१ ...

हिंगोली : निसर्गशाळेच्या सहाव्या आणि सातव्या तुकडीचे उद्घाटन हभप अविनाश महाराज भारती यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी महाराष्ट्रातील ३१ जिल्हे तसेच गोवा, आंध्र प्रदेशासह सौदी अरेबियातून मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी शाळेत सहभाग घेतला. कवी भारती यांनी संतांच्या काव्याचे दाखले देत निसर्गाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

'एक मूल तीस झाडे' या अभियानांतर्गत निसर्गाच्या शाळेची सुरुवात १ मे २०२१ रोजी झाली. या

शाळेचा हेतू मुलांना निसर्गाची माहिती देणे, हा असल्याने शाळा महाराष्ट्रभर पोहोचली. पालघर, मुंबई, नाशिक, रायगड, ठाणे, नवी मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांत शाळा पोहोचली आहे. गोव्यातील तीन भागांमध्ये, तर आंध्रातील हैदराबाद व सौदी अरेबियातील आर्यन दळवी आणि गौरवी दळवी या दोन विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेत नुकताच झाला आहे. विशेष म्हणजे प्रवेश घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांची आई ही सौदी अरेबियामध्ये मराठी शिक्षिका असून निसर्गाची माहिती त्या विद्यार्थ्यांना देतात.

१४ वर्षांखालील ८०० च्यावर विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. १४ वर्षांखालील मुलांच्या अंगी शेती, माती, झाड, पाणी, एकूणच निसर्गाविषयी जाणिवा-नेणिवा तयार होऊन निष्ठा निर्माण होण्यासाठी ही शाळा काम करत आहे. मुलांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणे गरजेचे आहे, हाच या शाळेचा मुख्य उद्देश आहे.

निसर्गशाळा आठवड्यातून एक दिवस, एक घंटा असते. बाकीचे दिवस कृतीसाठी राखीव आहेत. शाळेतील पहिल्या पाठांतर्गत ३०० विद्यार्थी घरच्याघरी फळझाडांची रोपवाटिका तयार करायला लागली आहेत. नियोजित अभ्यासक्रम, अनेक उपक्रम, प्रकल्प निसर्गशाळेत आहेत. याचबरोबर परीक्षा, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र, बक्षिसे शाळेत दिली जात आहेत. तसेच आठवड्याला उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार दिले जात आहेत. महाराष्ट्रातील पन्नासच्यावर तज्ज्ञ मार्गदर्शक या शाळेत मार्गदर्शन करतात. प्रा. ज्ञानोबा ढगे, रवी देशमुख, बालासाहेब राऊत, प्रेमानंद शिंदे, बाळू बुधवंत, श्याम राऊत, गोविंद दळवी, विलास जाधव, अनिता गायकवाड, सदा वडजे, रतन आडे, संजय मुसळे, प्रा. रेवती गव्हाणे 'एक मूल तीस झाडे' अभियानाचे शिक्षकमित्र शाळेला मदत करत आहेत.

शाळा मुलांना भविष्यासाठी घडवते

कोरोना महामारीच्या काळात पालकांसह मुले भविष्याविषयी चिंतित आहेत. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या पुढे जाऊन

निरोगी जगणे महत्त्वाचे झाले आहे. शेती, माती, झाड, पाणी, एकूणच निसर्गाला समजून घेऊन निसर्गाचे जतन करत योग्य उपभोग घेतला तरच निरोगी जगता येते, हे आता सर्वांना समजले आहे.

अण्णा जगताप, प्रमुख, निसर्गाची शाळा