शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

वसमत नगरपालिकेतील साडेअकरा कोटी रुपयांचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:49 IST

वसमत नगरपालिकेत सहाय्यक अनुदानासाठी जास्तीचे प्राप्त झालेले साडेअकरा कोटी रुपयाचे प्रकरण अद्यापही गूढच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. तर नगर परिषद संचालनालयाच्या संचालकांचेही चौकशीचे आश्वासन हवेतच विरत चालले असल्याचे चित्र समोर येत आहे.

ठळक मुद्देहवेतच विरतेय आश्वासन : जिल्हाधिका-यांच्या अहवालासह मंत्रालयाचेही मौन

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत नगरपालिकेत सहाय्यक अनुदानासाठी जास्तीचे प्राप्त झालेले साडेअकरा कोटी रुपयाचे प्रकरण अद्यापही गूढच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. तर नगर परिषद संचालनालयाच्या संचालकांचेही चौकशीचे आश्वासन हवेतच विरत चालले असल्याचे चित्र समोर येत आहे.वसमत नगरपालिकेने शासनाला खोटी माहिती पुरवून ११ कोटी ४५ लाख ३४ हजार एवढे जास्तीचे सहाय्यक अनुदान पदरात पाडून घेतले व वेतनासाठी खर्च न करता इतरत्र खर्च करून अनेकांनी चांगभले करून घेतले. सदर प्रकरण शासनाच्या लेखा परीक्षणात उघड झाल्यानंतर शासनाने सदरची रक्कम परत करण्याचे आदेश काढले व खोटी माहिती देऊन अनुदानाची मागणी करणाºया अधिकारी- कर्मचाºयांवर कारवाई प्रस्थापीत करण्याचे आदेश काढण्यात आले मात्र अद्याप २०१३ पासून नगरपालिकेने शासनाकडे न माहिती सादर केली न परतफेड केली.दरम्यान, शासनाने वसमत नगरपालिकेच्या सहाय्यक अनुदानात कपात करणे सुरू केले. सहायक अनुदान कपातीचा फटका कर्मचाºयांना बसल्याने सतत पाच वर्षापासून कर्मचारी आर्थिक संकटात सापडले होते. शेवटी लालबावटा संघटनेने प्रकरण थेट मुंबई दरबारात नेल्याने कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न मिटला. मात्र साडेअकरा कोटी रुपये गैरपद्धतीने इतर खर्च करून शासनालाच टोपी घालणारे डोके मात्र अद्यापही शाबूत आहेत.साडेअकरा कोटीच्या घोटाळ्याची चौकशीसाठी जिल्हाधिकाºयांनी समिती नेमून चौकशीही केली. पंधरा दिवसांत चौकशी अहवाल येणार होता. मात्र वर्ष होत आले तरी चौकशी अहवालही जाहीर झाला नाही.चौकशी अहवालात साडेअकरा कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने खर्च करणारे कोण आहेत, हे स्पष्ट झाले की नाही, हाच खरा प्रश्न आहे.कर्मचारी संघटनेने मुंबई येथे नगर परिषद संचालनालयासमोर उपोषण करून चौकशीची मागणी लावून धरली होती.सहाय्यक संचालकांनी कर्मचाºयांना पत्र देवून चौकशी होईल, दोषींवर कारवाई होईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र लेखी आश्वासनानंतरही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. कर्मचारी संघटनेने लावून धरलेल्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी कर्मचाºयांचे वेतन नियमित करण्याचा निर्णय तेवढा घेतला गेला. त्यानंतर मात्र हालचाल बंद झाली तर आता थंड बस्त्यात पोहोचते की काय? असा प्रश्न पडला आहे.शासनाच्या तिजोरीतून साडेअकरा कोटी रुपये चुकीची माहिती देऊन मिळवायचे त्या रकमेपैकी काही रक्कम शासनाकडेच दुसरी योजना पदरात पाडून घेण्यासाठी लोकवर्गणी म्हणून भरायची व दुसºया योजनेतील मिळालेला निधीतून टक्केवारीचा हिशेब करायचा असा हा शासनाच्या तिजोरीलाच हात घालणारा घोटाळा आहे. मात्र हा घोटाळा दडपला जाण्यासाठी नगरविकास संचालनालयाही प्रयत्न करावा लागत आहे की काय? असा प्रश्न पडत आहे.सर्वांचे लक्ष : तारांकित प्रश्नाचे उत्तर काय?सदर प्रकरणात अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाला. मात्र या तारांकित प्रश्नातून काय उत्तर निघाले हेही समजण्यास मार्ग नाही. कर्मचारी संघटना आक्रमक झाल्याचे पाहून औरंगाबाद आयुक्तांनी कर्मचाºयांची देणी १४ व्या वित्त आयोगातून देण्याचा तोंडी आदेश दिला होता. त्यानुसार १४ व्या वित्त आयोगातून दोन कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम पगार व देणी यावर खर्च झाली. १४ व्या वित्त आयोगातून कर्मचाºयांचे वेतन करणे हे कायदेशीर की गैर कायदेशीर आहे, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.