शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वसमत नगरपालिकेतील साडेअकरा कोटी रुपयांचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:49 IST

वसमत नगरपालिकेत सहाय्यक अनुदानासाठी जास्तीचे प्राप्त झालेले साडेअकरा कोटी रुपयाचे प्रकरण अद्यापही गूढच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. तर नगर परिषद संचालनालयाच्या संचालकांचेही चौकशीचे आश्वासन हवेतच विरत चालले असल्याचे चित्र समोर येत आहे.

ठळक मुद्देहवेतच विरतेय आश्वासन : जिल्हाधिका-यांच्या अहवालासह मंत्रालयाचेही मौन

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत नगरपालिकेत सहाय्यक अनुदानासाठी जास्तीचे प्राप्त झालेले साडेअकरा कोटी रुपयाचे प्रकरण अद्यापही गूढच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. तर नगर परिषद संचालनालयाच्या संचालकांचेही चौकशीचे आश्वासन हवेतच विरत चालले असल्याचे चित्र समोर येत आहे.वसमत नगरपालिकेने शासनाला खोटी माहिती पुरवून ११ कोटी ४५ लाख ३४ हजार एवढे जास्तीचे सहाय्यक अनुदान पदरात पाडून घेतले व वेतनासाठी खर्च न करता इतरत्र खर्च करून अनेकांनी चांगभले करून घेतले. सदर प्रकरण शासनाच्या लेखा परीक्षणात उघड झाल्यानंतर शासनाने सदरची रक्कम परत करण्याचे आदेश काढले व खोटी माहिती देऊन अनुदानाची मागणी करणाºया अधिकारी- कर्मचाºयांवर कारवाई प्रस्थापीत करण्याचे आदेश काढण्यात आले मात्र अद्याप २०१३ पासून नगरपालिकेने शासनाकडे न माहिती सादर केली न परतफेड केली.दरम्यान, शासनाने वसमत नगरपालिकेच्या सहाय्यक अनुदानात कपात करणे सुरू केले. सहायक अनुदान कपातीचा फटका कर्मचाºयांना बसल्याने सतत पाच वर्षापासून कर्मचारी आर्थिक संकटात सापडले होते. शेवटी लालबावटा संघटनेने प्रकरण थेट मुंबई दरबारात नेल्याने कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न मिटला. मात्र साडेअकरा कोटी रुपये गैरपद्धतीने इतर खर्च करून शासनालाच टोपी घालणारे डोके मात्र अद्यापही शाबूत आहेत.साडेअकरा कोटीच्या घोटाळ्याची चौकशीसाठी जिल्हाधिकाºयांनी समिती नेमून चौकशीही केली. पंधरा दिवसांत चौकशी अहवाल येणार होता. मात्र वर्ष होत आले तरी चौकशी अहवालही जाहीर झाला नाही.चौकशी अहवालात साडेअकरा कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने खर्च करणारे कोण आहेत, हे स्पष्ट झाले की नाही, हाच खरा प्रश्न आहे.कर्मचारी संघटनेने मुंबई येथे नगर परिषद संचालनालयासमोर उपोषण करून चौकशीची मागणी लावून धरली होती.सहाय्यक संचालकांनी कर्मचाºयांना पत्र देवून चौकशी होईल, दोषींवर कारवाई होईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र लेखी आश्वासनानंतरही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. कर्मचारी संघटनेने लावून धरलेल्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी कर्मचाºयांचे वेतन नियमित करण्याचा निर्णय तेवढा घेतला गेला. त्यानंतर मात्र हालचाल बंद झाली तर आता थंड बस्त्यात पोहोचते की काय? असा प्रश्न पडला आहे.शासनाच्या तिजोरीतून साडेअकरा कोटी रुपये चुकीची माहिती देऊन मिळवायचे त्या रकमेपैकी काही रक्कम शासनाकडेच दुसरी योजना पदरात पाडून घेण्यासाठी लोकवर्गणी म्हणून भरायची व दुसºया योजनेतील मिळालेला निधीतून टक्केवारीचा हिशेब करायचा असा हा शासनाच्या तिजोरीलाच हात घालणारा घोटाळा आहे. मात्र हा घोटाळा दडपला जाण्यासाठी नगरविकास संचालनालयाही प्रयत्न करावा लागत आहे की काय? असा प्रश्न पडत आहे.सर्वांचे लक्ष : तारांकित प्रश्नाचे उत्तर काय?सदर प्रकरणात अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाला. मात्र या तारांकित प्रश्नातून काय उत्तर निघाले हेही समजण्यास मार्ग नाही. कर्मचारी संघटना आक्रमक झाल्याचे पाहून औरंगाबाद आयुक्तांनी कर्मचाºयांची देणी १४ व्या वित्त आयोगातून देण्याचा तोंडी आदेश दिला होता. त्यानुसार १४ व्या वित्त आयोगातून दोन कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम पगार व देणी यावर खर्च झाली. १४ व्या वित्त आयोगातून कर्मचाºयांचे वेतन करणे हे कायदेशीर की गैर कायदेशीर आहे, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.