शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

'आमच्या किडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या'; हतबल शेतकऱ्यांनी बँकेकडे केली मागणी

By यशवंत भीमराव परांडकर | Published: May 03, 2024 6:38 PM

दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आर्थिक कंगाल झाल्याचे चित्र

- दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली): यंदा निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीत शासन आदेश असूनही बँकांकडून पीककर्ज पुनर्गठन केले जात नाही. तेव्हा खत, बियाणे खरेदी व खरिपाच्या पेरणीचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे. यामुळे आमच्या किडन्या गहाण ठेवून पीककर्ज द्या, अशी मागणी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून ३ मे रोजी लेखी निवेदनाद्वारे बँक शाखाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

गत खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. तर रब्बी हंगामातही अवकाळीच्या घाल्यामुळे पिकांची नासाडी झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांना उत्पन्न घटीचा दुहेरी फटका सहन करावा लागला आहे. एकंदरीत निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आर्थिक कंगाल झाल्याचे चित्र आहे. अगोदरच पीक कर्जापायी शेतजमिनी बँकांकडे गहाण असल्याने बँक कर्ज देईना. दुष्काळ परिस्थितीत पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे शासन आदेश असताना पुनर्गठन ही करण्यास नकार दिला जात आहे. तेव्हा पुढील खरीप हंगामासाठी खत बी-बियाणे खरेदी व पेरणीचा खर्च भागवायचा कसा ? असा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.

शेतकऱ्यांनी दिले बँक शाखाधिकाऱ्यांना निवेदन...आमच्या किडन्या गहाण ठेवून किंवा विकत घेऊन आम्हाला ‘ पीककर्ज द्या’ अशी मागणी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी ३ मे रोजी गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर संगीता पतंगे, दसरथ मानमोठे, पांडुरंग मानमोठे, विनायक कावरखे, दशरथ मुळे, संतोष वैद्य, विजय कावरखे, रामराव पतंगे, विकास सावके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जHingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र