शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोसिकॉलची कोट्यवधींची यंत्रसामुग्री पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:43 IST

पूर्वी वापरात असलेल्या महाराष्टÑ राज्य तेल महामंडळांतर्गत महागाड्या मशिनमुळे ट्रकच्या ट्रक सरकी काही वेळात गाळप करून लाखो लिटर तेल उत्पादन करणारा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प बंद पडला आहे. येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गुजरात पॅटर्नअंतर्गत वेतनाचा लाभ मिळाला असला तरीही महागाड्या मशिन व जागा अद्याप धूळ खात पडलेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पूर्वी वापरात असलेल्या महाराष्टÑ राज्य तेल महामंडळांतर्गत महागाड्या मशिनमुळे ट्रकच्या ट्रक सरकी काही वेळात गाळप करून लाखो लिटर तेल उत्पादन करणारा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प बंद पडला आहे. येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गुजरात पॅटर्नअंतर्गत वेतनाचा लाभ मिळाला असला तरीही महागाड्या मशिन व जागा अद्याप धूळ खात पडलेल्या आहेत.सन १९८३ मध्ये महाराष्टÑ राज्य तेल महामंडळांतर्गत अमरावती येथील ३३ एकर जागेवर सुरु केलेल्या सॉल्व्हंट रिफाईन प्लांटअंतर्गत हिंगोली आणि परभणी, गंगाखेड येथेही हा प्लांट सुरु करण्यात आला. केवळ पाच वर्षच हा प्लांट सुरळीत चालला. नंतर १९८८ मध्ये बंद पडला. प्लांट सुरु असताना हिंगोली येथील प्लांटमध्ये असलेल्फा मोठ मोठ्या मशीनमध्ये ट्रकच्या ट्रक सरकी काही वेळात गाळप होत होती. तर या ठिकाणी सरकीही कापूस महामंडळाकडून घेतली जात होती. विदेशी बाजारपेठेत या प्लांटला खुप महत्त्व प्राप्त होते. या ठिकाणी जवळपास २०८ कामगार कार्यरत होते. मोजकेच वर्ष या प्लांटचा कारभार व्यवस्थित झाला. एकवेळा एका मोठ्या खरेदीदाराने तब्बल २ करोड रुपयाचे नेलेल्या तेलाची रक्कमच शासनाकडे न भरल्यामुळे तेव्हापासूनच हा प्लांट दिवाळखोरीत सापडला आहे. पुढे तो सुरु करण्यासाठी शासनाने हालचालीदेखील केल्या नाहीत. त्यातच जिल्ह्यात कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आणि प्लांटही बंद पडला. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयाच्या मशिन वापराअभावी धूळ खात पडल्या आहेत. तसेच या मशीन पूर्णत: कालबाह्य झाल्याने त्या सुरु होणे तर सोडाच परंतु त्यांची विक्री करण्यासाठी तीन ते चारवेळा लिलाव बोलावला होता. मात्र मशिनची कमी किंमतीत मागणी केल्याने लिलाव प्रक्रिया थांबविली होती. यात मशिन भविष्यात भंगारातच काढण्याची वेळ येण्याची भीती आहे. शिवाय भव्य गोदामही वापराअभावी मोडकळीस आलेले आहेत. एका वर्षापूर्वी बियाणे महामंडळाने ४.५४ रुपये प्रतिस्क्वेअर फुटने प्रतिमहिना भाडे तत्त्वावर घेतली होती. त्यामुळे प्रत्येक महिन्याला जवळपास १ ते दीड लाख रुपये शासनाच्या पदरात पडत होते. मात्र बियाणे महामंडळाने स्वत:च्या इमारतीत प्लांट सुरु केल्यामुळे आता गोडाऊन पूर्णत: रिकामे पडलेले आहेत. तसेच इमारतीच्या भिंतीलाही जागो- जागी तडे गेले असून, के व्हाही कोसळण्याची भीती आहे. तर येथील कर्मचाºयांच्या निवासस्थानाचीही दुरवस्था झाली असून, ड्रेनेजही चोकअप झाले आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी एकदा नव्हे, दोनवेळेस या कार्यालयास नोटिसा बजावून जागा शासनाच्या ताब्यात देण्याचे सुचविल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगितले जाते. मात्र येथील मशिनरीची विक्रीच न झाल्याने अजून तरी हा प्रश्न रेंगाळलेला आहे. हा केवळ एकाच ठिकाणचा प्लांट धूळ खात पडला नसून अमरावती, परभणी आणि गंगाखेड येथील प्लांटची हिच स्थिती आहे. त्यामुळे आता या जागेची जबाबदारी १९९३ मध्ये फेडरेशन विभागाकडे सोपवलेली आहे. तर यात कार्यरत कर्मचाºयांना गुजरात पॅटर्ननुसार वेतन देऊन सेवानिवृत्ती दिली. त्यामुळे अनेक कर्मचाºयांची इच्छा नसतानाही सेवानिवृत्ती घेण्याची वेळ आली. मात्र यामध्ये कर्मचारी खुश असल्याच्या बोलबाला केला जात आहे. मात्र प्लांटच बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने व इतर ठिकाणी बदली करण्याचे वारंवार धमकावले जात असल्याने कर्मचाºयांना सेवानिवृत्तीचा मार्ग अवलंबवावा लागला. आजघडिला हा प्लांट पुन्हा सुरु होत नसला तरीही याची दुरुस्ती जरी करायचे म्हटले तर ४० ते ५० लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या जागेचा वापर करायचा तरी कसा? हा मोठा प्रश्न आहे. त्यातच अजूनही शासनाच्या ताब्यातही ही जागा देण्यात आलेली नाही, हे विशेष! शासनाने जर हा प्रकल्प पुन्हा सुरु केला तर अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होऊन सुशिक्षित बेरोजगारांना आधार होऊ शकतो. मात्र सगळीकडेच कपाशीचे उत्पादन अपेक्षित प्रमाणात घेतले जात नसल्याने तो सुरू करण्याचा मार्गही तेवढा सोपा राहिला नाही.तर सध्या या ठिकाणी दोन ते तीन महिन्याचे ५१ हजार रुपयांचे विद्युत बिल आल्यामुळे येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती फेडरेशनच्या कर्मचाºयांनी दिली. त्यामुळे रात्र अंधारात काढण्याची वेळ येत आहे.हा प्लांट सुरुवातीला व्यस्थितरीत्या सुरु असला तरीही यामध्ये असलेली एकाधिकार पद्धत प्लांटला चांगलीच भोवली आहे. हे कार्यालय पूर्णत: मुंबई येथून चालत असल्याने, तेथेच संपूर्ण नियोजन होत होते. यामध्ये बाजारभाव, तेल विक्रीचे भाव तसेच मशिनरी साठी लागणारे पार्ट सर्व काही एकाचठिकाणावरुन सुरु असल्याने, अनेकदा भाव वाढल्यानंतरही या अधिकाºयांनी वेळीच निर्णय न घेतल्याने व त्याकाळच्या दलालाने केलेल्या सहकार्यामुळे संपूर्ण प्लांटच डबघाईला आला आहे. आजघडीला भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे.हा प्लांट फेडरेशनच्या ताब्यात असल्यामुळे अधिकाºयांच्या सूचनेशिवाय येथील काडीही हलविली जात नसल्याचे झोनल अधिकारी अशोक रेणके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प