शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

चिमुकलीला कवटाळून विहिरीत घेतली उडी; पतीसोबत भांडणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:45 IST

विहिरीच्या काठावर ठेवलेल्या हंड्यामुळे शेजारी राहणाऱ्या मुलीला शंका आल्याने तिने विहिरीत डोकावून पाहिले असता तिला सीमा ही मुलीला कवटाळलेल्या अवस्थेत पाण्यावर गटांगळ्या खात असल्याची दिसली.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : नवऱ्यासोबत झालेल्या किरकोळ भांडणावरून जामगव्हाण येथील विवाहित महिला सीमा ज्ञानेश्वर मुकाडे (२२) हिने अडीच वर्षीय मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली. सकाळी नवरा-बायकोचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात सीमाने टोकाचे पाऊल उचलत अडीच वर्षीय मुलीला कवटाळून विहिरीत उडी घेतली. त्यातच माय-लेकीचा करुण अंत झाला. याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पिंपळदरी येथील तातेराव रिठे यांची मुलगी सीमा हिचा विवाह जामगव्हाण येथील ज्ञानेश्वर मुकाडे यांच्यासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. संसाराचा गाडा पुढे चालत असताना २६ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास नवऱ्यासोबत झालेल्या वादानंतर सीमाने टोकाचे पाऊल उचलत काठावर पाण्याचा हंडा ठेवून आपल्या मुलीसह शेतातील विहिरीत उडी घेतली. विहिरीच्या काठावर ठेवलेल्या हंड्यामुळे शेजारी राहणाऱ्या मुलीला शंका आल्याने तिने विहिरीत डोकावून पाहिले असता तिला सीमा ही मुलीला कवटाळलेल्या अवस्थेत पाण्यावर गटांगळ्या खात असल्याची दिसली. लागलीच तिने वडील संजय मुकाडे यांना बोलावून घेतले; परंतु तोपर्यंत दोघींचा बुडून करुण अंत झाला. संजय मुकाडे यांनी औंढा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देताच पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी पोलिस उपनिरीक्षक खुद्दस शेख, गजानन गिरी, ओंकारेश्वर राजणीकर, संदीप गोरे, अमोल चव्हाण यांना घटनास्थळी रवाना केले.

आठ तासांनंतर दोघींना काढले बाहेरविहिरीमध्ये पाणी असल्याने विहिरीतले पाणी उपसून तब्बल आठ तासांनंतर एकमेकींना बिलगलेल्या अवस्थेत असलेले माय-लेकींचे शव बाहेर काढण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दोघींचे शव पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.

वीस तासांनंतर शवविच्छेदनपिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी माय-लेकींचे शव पाठविण्यात आल्यानंतर आरोग्य केंद्रात एकही अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने दोघींचे मृतदेह ताटकळत ठेवावे लागले. त्यातच शवगृहात शव ठेवण्यास आरोग्य केंद्राकडून असमर्थता दर्शविल्याने नातेवाइकांची कोंडी झाली. शेवटी तालुका आरोग्य अधिकारी गजानन चव्हाण यांना संपर्क साधून मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले. तब्बल वीस तासांनंतर २७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. जामगव्हाण येथील तलावाशेजारी शेतात दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू