शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीला कवटाळून विहिरीत घेतली उडी; पतीसोबत भांडणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:45 IST

विहिरीच्या काठावर ठेवलेल्या हंड्यामुळे शेजारी राहणाऱ्या मुलीला शंका आल्याने तिने विहिरीत डोकावून पाहिले असता तिला सीमा ही मुलीला कवटाळलेल्या अवस्थेत पाण्यावर गटांगळ्या खात असल्याची दिसली.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : नवऱ्यासोबत झालेल्या किरकोळ भांडणावरून जामगव्हाण येथील विवाहित महिला सीमा ज्ञानेश्वर मुकाडे (२२) हिने अडीच वर्षीय मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली. सकाळी नवरा-बायकोचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात सीमाने टोकाचे पाऊल उचलत अडीच वर्षीय मुलीला कवटाळून विहिरीत उडी घेतली. त्यातच माय-लेकीचा करुण अंत झाला. याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पिंपळदरी येथील तातेराव रिठे यांची मुलगी सीमा हिचा विवाह जामगव्हाण येथील ज्ञानेश्वर मुकाडे यांच्यासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. संसाराचा गाडा पुढे चालत असताना २६ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास नवऱ्यासोबत झालेल्या वादानंतर सीमाने टोकाचे पाऊल उचलत काठावर पाण्याचा हंडा ठेवून आपल्या मुलीसह शेतातील विहिरीत उडी घेतली. विहिरीच्या काठावर ठेवलेल्या हंड्यामुळे शेजारी राहणाऱ्या मुलीला शंका आल्याने तिने विहिरीत डोकावून पाहिले असता तिला सीमा ही मुलीला कवटाळलेल्या अवस्थेत पाण्यावर गटांगळ्या खात असल्याची दिसली. लागलीच तिने वडील संजय मुकाडे यांना बोलावून घेतले; परंतु तोपर्यंत दोघींचा बुडून करुण अंत झाला. संजय मुकाडे यांनी औंढा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देताच पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी पोलिस उपनिरीक्षक खुद्दस शेख, गजानन गिरी, ओंकारेश्वर राजणीकर, संदीप गोरे, अमोल चव्हाण यांना घटनास्थळी रवाना केले.

आठ तासांनंतर दोघींना काढले बाहेरविहिरीमध्ये पाणी असल्याने विहिरीतले पाणी उपसून तब्बल आठ तासांनंतर एकमेकींना बिलगलेल्या अवस्थेत असलेले माय-लेकींचे शव बाहेर काढण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दोघींचे शव पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.

वीस तासांनंतर शवविच्छेदनपिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी माय-लेकींचे शव पाठविण्यात आल्यानंतर आरोग्य केंद्रात एकही अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने दोघींचे मृतदेह ताटकळत ठेवावे लागले. त्यातच शवगृहात शव ठेवण्यास आरोग्य केंद्राकडून असमर्थता दर्शविल्याने नातेवाइकांची कोंडी झाली. शेवटी तालुका आरोग्य अधिकारी गजानन चव्हाण यांना संपर्क साधून मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले. तब्बल वीस तासांनंतर २७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. जामगव्हाण येथील तलावाशेजारी शेतात दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू