शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अनेक नवे चेहरे उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

सध्या हिंगोली जिल्ह्याचे सहा संचालक आहेत. यात हिंगोलीतून आ.तान्हाजी मुटकुळे, औंढ्यातून ॲड. बाबा नाईक, वसमतमधून आंबादास भोसले, कळमनुरीतून सुरेश ...

सध्या हिंगोली जिल्ह्याचे सहा संचालक आहेत. यात हिंगोलीतून आ.तान्हाजी मुटकुळे, औंढ्यातून ॲड. बाबा नाईक, वसमतमधून आंबादास भोसले, कळमनुरीतून सुरेश वडगावकर, सेनगावमधून साहेबराव पाटील गोरेगावकर तर महिलांमधून रूपाली पाटील गोरेगावकर यांनी मागच्या निवडणुकीत बाजी मारली होती. बहुतांश जागा बिनविरोधच झाल्या होत्या.

यावेळीही विद्यमानांपैकी जवळपास सर्वच इच्छुक आहेत. मात्र, काही नवे चेहरेही चाचपणी करताना दिसत आहेत. अजून उघडपणे कोणी समोर आले नाही. मात्र, तयारी सुरू आहे. मुटकुळे हे भाजपचे तर भोसले राष्ट्रवादीचे आहेत. वडगावकर व नाईक त्यावेळी काँग्रेसचे होते. यापैकी वडगावकर आता सेनेचे आहेत. रूपाली पाटील सेनेच्या विद्यमान जि.प.सभापती आहेत, तर साहेबराव पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. मात्र, आता कोण कोणत्या पक्षाशी संगत करून कोणत्या पॅनलमध्ये आघाडी करेल, हे सांगता येत नाही. परभणी जिल्ह्यातील संचालकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तिकडून जी नेतेमंडळी पॅनल तयार करील, त्यात सोयीप्रमाणे हिंगोलीतील नेतेमंडळी जागा मिळवितात की, मागच्याप्रमाणे जो तो आपल्या बळावर बँकेवर जाईल, हे लवकरच कळणार आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.से. सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्थांच्या तालुकानिहाय असलेल्या मतदारसंघात ९४३ मतदारसंख्या आहे. यात हिंगोली ९५, औंढा ६३, वसमत ७८, कळमनुरी ८६, सेनगाव ८२ अशी तालुकानिहाय आकडेवारी आहे, तर उर्वरित परभणी जिल्ह्यातील मतदार आहेत. याशिवाय इतर पाच राखीव मतदारसंघ आहेत. त्यात महिला २, इतर मागस, जाती व जमाती आदींचा समावेश आहे. शेतमाल प्रक्रिया मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प मतदार आहेत. यात हिंगोली १, औंढा १, वसमत ३, कळमनुरी १ असे सहाच मतदार आहेत, तर इतर बिगर शेती मतदारसंघात हिंगोली ३८, सेनगाव २०, औंढा १२, वसमत ३३, कळमनुरी १५ अशी संख्या आहे, तर दोन्ही जिल्ह्यांचे मिळून ५१४ मतदार आहेत. त्यामुळे यात परभणी जिल्ह्याचाच वरचष्मा राहत आला आहे. मागच्यावेळी अंबादास भोसले यांच्या रूपाने जिल्ह्याला बँकेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. यंदा निवडणुकीनंतरच जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होईल. सध्या न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणुकीची प्रक्रिया ठप्प आहे.