शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अनेक नवे चेहरे उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST

सध्या हिंगोली जिल्ह्याचे सहा संचालक आहेत. यात हिंगोलीतून आ.तान्हाजी मुटकुळे, औंढ्यातून ॲड. बाबा नाईक, वसमतमधून आंबादास भोसले, कळमनुरीतून सुरेश ...

सध्या हिंगोली जिल्ह्याचे सहा संचालक आहेत. यात हिंगोलीतून आ.तान्हाजी मुटकुळे, औंढ्यातून ॲड. बाबा नाईक, वसमतमधून आंबादास भोसले, कळमनुरीतून सुरेश वडगावकर, सेनगावमधून साहेबराव पाटील गोरेगावकर तर महिलांमधून रूपाली पाटील गोरेगावकर यांनी मागच्या निवडणुकीत बाजी मारली होती. बहुतांश जागा बिनविरोधच झाल्या होत्या.

यावेळीही विद्यमानांपैकी जवळपास सर्वच इच्छुक आहेत. मात्र, काही नवे चेहरेही चाचपणी करताना दिसत आहेत. अजून उघडपणे कोणी समोर आले नाही. मात्र, तयारी सुरू आहे. मुटकुळे हे भाजपचे तर भोसले राष्ट्रवादीचे आहेत. वडगावकर व नाईक त्यावेळी काँग्रेसचे होते. यापैकी वडगावकर आता सेनेचे आहेत. रूपाली पाटील सेनेच्या विद्यमान जि.प.सभापती आहेत, तर साहेबराव पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. मात्र, आता कोण कोणत्या पक्षाशी संगत करून कोणत्या पॅनलमध्ये आघाडी करेल, हे सांगता येत नाही. परभणी जिल्ह्यातील संचालकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तिकडून जी नेतेमंडळी पॅनल तयार करील, त्यात सोयीप्रमाणे हिंगोलीतील नेतेमंडळी जागा मिळवितात की, मागच्याप्रमाणे जो तो आपल्या बळावर बँकेवर जाईल, हे लवकरच कळणार आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.से. सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्थांच्या तालुकानिहाय असलेल्या मतदारसंघात ९४३ मतदारसंख्या आहे. यात हिंगोली ९५, औंढा ६३, वसमत ७८, कळमनुरी ८६, सेनगाव ८२ अशी तालुकानिहाय आकडेवारी आहे, तर उर्वरित परभणी जिल्ह्यातील मतदार आहेत. याशिवाय इतर पाच राखीव मतदारसंघ आहेत. त्यात महिला २, इतर मागस, जाती व जमाती आदींचा समावेश आहे. शेतमाल प्रक्रिया मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प मतदार आहेत. यात हिंगोली १, औंढा १, वसमत ३, कळमनुरी १ असे सहाच मतदार आहेत, तर इतर बिगर शेती मतदारसंघात हिंगोली ३८, सेनगाव २०, औंढा १२, वसमत ३३, कळमनुरी १५ अशी संख्या आहे, तर दोन्ही जिल्ह्यांचे मिळून ५१४ मतदार आहेत. त्यामुळे यात परभणी जिल्ह्याचाच वरचष्मा राहत आला आहे. मागच्यावेळी अंबादास भोसले यांच्या रूपाने जिल्ह्याला बँकेचे उपाध्यक्षपद मिळाले होते. यंदा निवडणुकीनंतरच जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होईल. सध्या न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणुकीची प्रक्रिया ठप्प आहे.