शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

वर्दीतला माणूस करतो ‘त्या’ गुरांचा सांभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:56 AM

निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेशकडून हैदराबादकडे कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजी पकडला होता. आठ दिवसांपासून या गुरांचा सांभाळ पोलीस करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेशकडून हैदराबादकडे कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजी पकडला होता. आठ दिवसांपासून या गुरांचा सांभाळ पोलीस करत आहेत.हिंगोलीत नांदेड नाका येथून गुरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजीच्या रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला होता. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी सेनगाव येथून येत असताना त्यांना गुरे घेऊन जाणारा उभा ट्रक आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता, ट्रकमध्ये निर्दयीपणे गुरे कोंबल्याचे निदर्शनास आले. हा ट्रक पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणत गुरांना खाली उतरवले होते. ट्रकमध्ये एकावर एक कोंबल्यामुळे अनेक गुरे जखमी झाले होते. काही जनावरांचा मृत्यूही झाला होता. दोन जनावरांना जागेवरुन हलताही येत नाही. ते वाहनातून काढल्यानंतर तेथेच पडून आहेत. आता पोलिसांच्या ताब्यातील ४६ जनावरांची देखभालीसाठी मदत करण्याचे आवाहन पोलिसांनीकेले आहे. निवारा तसेच चारा पाण्याची व्यवस्था शहर पोलीस ठाण्याने आतापर्यंत केली आहे. चाऱ्यासाठी प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन फौजदार पी. के. कांबळे यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSocialसामाजिक