शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा की उन्हाळा हेच कळेना! मामा तुम्हीच सांगा, लग्नामध्ये कोट घालू की रेनकोट..?

By विजय पाटील | Updated: May 5, 2023 16:13 IST

अचानकपणे येत असलेल्या अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात बाधा येऊन वऱ्हाडी मंडळींची विचारपूस करण्याऐवजी पावसाकडेच पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

हिंगोली: गत महिनाभरापासून अवकाळी पाऊस अधून-मधून सुरूच आहे. त्यामुळे लग्नामध्ये कोट घालू की रेनकोट? असा प्रश्न नवरदेव मंडळी आप्तेष्टांना करत आहेत. सकाळी ऊन पडते, दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होते आणि नंतर अवकाळी पाऊस पडायला सुरुवात होते. चैत्र आणि वैशाख हे मराठी महिने लग्नसराईचे असतात. त्यामुळे वधू-वरांकडील आप्तेष्ट तसेच वऱ्हाडी मंडळी लग्नकार्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळतात.

दोन-अडीच वर्षांपूर्वी कोरोनामुळे लग्नकार्य पूर्णत: थांबले होते. आता कोरोना संपुष्टात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात लग्नकार्य सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात व्यत्यय निर्माण होत आहे. चैत्र महिन्यातील तिथी सोयीची असते असे पाहून अनेकांनी मंगल कार्यालय राखीव करून ठेवले आहेत. परंतु, अचानकपणे येत असलेल्या अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात बाधा येऊन वऱ्हाडी मंडळींची विचारपूस करण्याऐवजी पावसाकडेच पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

शहरी भागात विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालय, हॉल आदींची व्यवस्था असते. परंतु, ग्रामीण भागात मात्र मोकळ्या जागेत किंवा गावाशेजारील शेतामध्ये विवाह सोहळा होतो. परंतु, महिनाभरापासून अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत असल्याने वऱ्हाडी मंडळींची फजिती होत आहे.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीmarriageलग्न