शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडनहून कुटुंबासह थेट भारत जोडो यात्रेत, महाराष्ट्रभर पाई चालणार

By विजय पाटील | Updated: November 12, 2022 13:11 IST

मूळचे नाशिक जिल्ह्यातील महाडचे असलेले डॉक्टर लंडनमध्ये स्थायिक आहेत,

हिंगोली : खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ( Bharat Jodo Yatra )  सहभागी होण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून नागरिक येत आहेत. एक अनिवासी भारतीय कुटुंब तर थेट लंडनहून आले असून मागील सहा दिवसांपासून या यात्रेत पायी चालत आहे.

मूळचे रायगड जिल्हयातील महाडगाव महाडचे असलेले डॉ. सुबोध कांबळे हे लंडनमध्ये स्थायिक आहेत. तेथे त्यांना नागरिकत्वही मिळालेले आहे. तरीही ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले. त्यांच्यासमवेत पत्नी भारुलता पटेल-कांबळे, मुलगा प्रियम कांबळे, आरुष कांबळे हेही आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून ते यात्रेत सहभागी झाले आहेत. 

याबाबत विचारले असता डॉ. सुबोध कांबळे म्हणाले, राहुल गांधी यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याबद्दल कुतुहलही आहे. सध्या देशात जे वातावरण आहे, ते पाहता राहुल गांधी यांचे जे देश जोडण्याचे प्रयत्न आहेत, त्यांना साथ देण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न आहे. त्यांचा प्रयत्न खुप महत्त्वाचा आहे. इतरही अनेक मुद्दे आहेत, त्यासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्यामुळे मी देगलूर येथून या यात्रेत सहभागी झालो. महाराष्ट्रात ही यात्रा असेपर्यंत यात सहभागी होणार आहोत.

भारुलता म्हणाल्या की, आमच्या भविष्यातील पिढीसाठी हा एक मोठा संदेश आहे. आम्ही विविधतेतून एकतेचा संदेश पाळला पाहिजे. अनेक भाषा, धर्म जाती आहेत. मात्र तरीही एकत्रित राहतो. आम्ही धर्म, जातीमध्ये विभागलो नाही पाहिजे. ही यात्रा एखाद्या पक्षाची यात्रा आहे म्हणून याकडे पाहात नसून ही यात्रा खरेच भारत जोडण्यासाठी असल्यानेत्यात सहभागी झालो आहोत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राHingoliहिंगोलीRahul Gandhiराहुल गांधी