शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

उन्हामुळे कार्यकर्ते सोडा, मतदारही भेटेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:31 IST

लोकसभा मतदारसंघात तब्बल १७00 गावे फिरण्यासाठी उमेदवारांना वेळ अपुरा पडणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मिळेल त्या वाहनाने जाऊन कार्यकर्ते प्रचार करीत असले तरीही उन्हामुळे मात्र बेजार झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात तब्बल १७00 गावे फिरण्यासाठी उमेदवारांना वेळ अपुरा पडणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मिळेल त्या वाहनाने जाऊन कार्यकर्ते प्रचार करीत असले तरीही उन्हामुळे मात्र बेजार झाले आहेत.हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील सर्व तिन्ही विधानसभा, नांदेड जिल्ह्यातील हदगाव व किनवट विधानसभा तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा येते. यात प्रत्येक ठिकाणी वेगवेळ्या राज्यस्तयीर राजकीय नेत्यांची छाप असलेला हा भाग आहे. त्यातही प्रत्येक भागात वेगळ्या प्रभावी नेत्यांचीही कमी नाही. त्यामुळे अशा ‘प्रभावीं’ना वरून व त्यांचा कार्यकर्त्यांना केवळ संदेश मिळाला की, खाली आपोआप काम होते. मात्र यावेळी जरा चित्र वेगळे आहे. असे नेमके कोणते संदेश जातील, याची उमेदवारांनाही भीती आहे. एकतर सेनेने नवा चेहरा दिला. तर सेनेचा जुना चेहरा काँग्रेसकडून आल्याने तेही काँग्रेससाठी नवीनच आहेत. या नवागतांसमोर कार्यकर्ते जुनेच असूनही नवीन असल्यासारखे वाटत आहेत. त्यामुळे प्रचारयंत्रणा कामाला लावायलाच विलंब झाला. त्यात आता उन्हाचा पारा ४१ अंशांच्याही पुढे सरकत आहे. मागील काही दिवसांपासून हेच चित्र आहे. दुपारी शहरी व ग्रामीण भागातही रस्ते निर्जन होत आहेत. शेतशिवारात काम करणारे तेथेच झाडाखाली डुलकी देत असल्याने उमेदवारांना गावातही कोणी भेटत नाही. सकाळी व सायंकाळीच प्रचारावर भर द्यावा लागत आहे. दुपारच्या वेळी तंबूत अथवा मोठ्या हॉलमध्ये मेळावे होत आहेत. मात्र हे प्रमाण अतिशय कमी आहे.मागील काही दिवसांनंतर आता उमेदवार मैदानात आल्याचे दिसू लागले आहे. ग्रामीण भागात त्यांच्या सभा, बैठका होत आहेत. काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांनी आधी आपल्याच भागात प्रचार चालविला होता. आता हिंगोली जिल्हा प्रवेश केल्याचे दिसते. दुसरीकडे शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी मात्र दोन्हींकडे एकाच वेळी प्रचारयंत्रणा राबवित पत्नी राजश्री पाटील यांची त्यांनी मदत घेतली आहे.बसपाचे डॉ.दत्ता धनवे यांचीही अजून आपल्याच भागात प्रचारयंत्रणा दिसते. वंचित आघाडीचे मोहन राठोड मात्र आता किनवटबाहेर निघाले. हिंगोलीतही त्यांची प्रचारयंत्रणा दिसू लागली. एक-दोन अपक्ष वगळता इतर मात्र नुसते नावालाच अर्ज भरून घरी बसले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपक्षांना एवढी मोठी प्रचारयंत्रणा उभारणे, कार्यकर्ते जमा करणे अवघडच असते. एकीकडे पक्षीय व प्रमुख पक्षीय उमेदवारांना कार्यकर्ते जुळविणे व कामाला लावणे अवघड असताना अपक्षांना ते जमेल की नाही, हा प्रश्न आहे. दुसरे म्हणजे काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्याशी नामसाधर्म्याचेच आणखी पाच उमेदवार आहेत. अशांमुळे अर्जांची संख्या तेवढी वाढल्याचे दिसते.हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा कल कळण्याइतका मेळ लागणे जरा अवघडच जाते. कारण तीन जिल्ह्यात असलेल्या विस्तारात प्रत्येक तालुक्यातील ८0 ते १८0 गावे अन् प्रत्येक भागाची वेगळी स्थिती हे प्रमुख कारण आहे. ११ तालुक्यांत फिरणेच उमेदवारांना दमछाक करणारे असते. त्यातही सूर्याने डोळे वटारल्याने तर प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंतही जाणे अवघड होत आहे. निवडणुकीच्या खर्चात बसत करण्यासाठी काही उमेदवार गाड्या-घोड्यांची व्यवस्थाही करीत नसल्याचे दिसते. कार्यकर्त्यांनाच तालुक्याला बोलावले जात आहे.तापमानाचा पारा आता ४0 अंशांवरून ४१च्या पुढे सरकत आहे. दोन दिवस रात्रीला ढगाळ वातावरण होते. मात्र दिवसा कडक उन्हाचा तडाखा आहे. १८ तारखेपर्यंत तापमानात वाढीचाच अंदाज हवामान खात्याचा आहे.उन्हामुळे कार्यकर्ते जमत नसल्यामुळे की, अन्य कारणाने यावेळी गर्दीवर कुणाचाच भर दिसत नाही. गर्दी जमली की सीट लागली हे समीकरणच यावेळी दिसत नाही. तर गर्दी न जमविताच विजयाचा मार्ग शोधण्याचा दुसराही फंडा असू शकतो. यावेळी उघड हालचालींपेक्षा पडद्यामागेच राजकारण घडत असल्याचे दिसत आहे. शिवाय दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षात न घेता कामाला लावण्याकडेच उमेदवारांचा कल दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण