शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

उन्हामुळे कार्यकर्ते सोडा, मतदारही भेटेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:31 IST

लोकसभा मतदारसंघात तब्बल १७00 गावे फिरण्यासाठी उमेदवारांना वेळ अपुरा पडणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मिळेल त्या वाहनाने जाऊन कार्यकर्ते प्रचार करीत असले तरीही उन्हामुळे मात्र बेजार झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात तब्बल १७00 गावे फिरण्यासाठी उमेदवारांना वेळ अपुरा पडणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मिळेल त्या वाहनाने जाऊन कार्यकर्ते प्रचार करीत असले तरीही उन्हामुळे मात्र बेजार झाले आहेत.हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील सर्व तिन्ही विधानसभा, नांदेड जिल्ह्यातील हदगाव व किनवट विधानसभा तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा येते. यात प्रत्येक ठिकाणी वेगवेळ्या राज्यस्तयीर राजकीय नेत्यांची छाप असलेला हा भाग आहे. त्यातही प्रत्येक भागात वेगळ्या प्रभावी नेत्यांचीही कमी नाही. त्यामुळे अशा ‘प्रभावीं’ना वरून व त्यांचा कार्यकर्त्यांना केवळ संदेश मिळाला की, खाली आपोआप काम होते. मात्र यावेळी जरा चित्र वेगळे आहे. असे नेमके कोणते संदेश जातील, याची उमेदवारांनाही भीती आहे. एकतर सेनेने नवा चेहरा दिला. तर सेनेचा जुना चेहरा काँग्रेसकडून आल्याने तेही काँग्रेससाठी नवीनच आहेत. या नवागतांसमोर कार्यकर्ते जुनेच असूनही नवीन असल्यासारखे वाटत आहेत. त्यामुळे प्रचारयंत्रणा कामाला लावायलाच विलंब झाला. त्यात आता उन्हाचा पारा ४१ अंशांच्याही पुढे सरकत आहे. मागील काही दिवसांपासून हेच चित्र आहे. दुपारी शहरी व ग्रामीण भागातही रस्ते निर्जन होत आहेत. शेतशिवारात काम करणारे तेथेच झाडाखाली डुलकी देत असल्याने उमेदवारांना गावातही कोणी भेटत नाही. सकाळी व सायंकाळीच प्रचारावर भर द्यावा लागत आहे. दुपारच्या वेळी तंबूत अथवा मोठ्या हॉलमध्ये मेळावे होत आहेत. मात्र हे प्रमाण अतिशय कमी आहे.मागील काही दिवसांनंतर आता उमेदवार मैदानात आल्याचे दिसू लागले आहे. ग्रामीण भागात त्यांच्या सभा, बैठका होत आहेत. काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांनी आधी आपल्याच भागात प्रचार चालविला होता. आता हिंगोली जिल्हा प्रवेश केल्याचे दिसते. दुसरीकडे शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी मात्र दोन्हींकडे एकाच वेळी प्रचारयंत्रणा राबवित पत्नी राजश्री पाटील यांची त्यांनी मदत घेतली आहे.बसपाचे डॉ.दत्ता धनवे यांचीही अजून आपल्याच भागात प्रचारयंत्रणा दिसते. वंचित आघाडीचे मोहन राठोड मात्र आता किनवटबाहेर निघाले. हिंगोलीतही त्यांची प्रचारयंत्रणा दिसू लागली. एक-दोन अपक्ष वगळता इतर मात्र नुसते नावालाच अर्ज भरून घरी बसले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपक्षांना एवढी मोठी प्रचारयंत्रणा उभारणे, कार्यकर्ते जमा करणे अवघडच असते. एकीकडे पक्षीय व प्रमुख पक्षीय उमेदवारांना कार्यकर्ते जुळविणे व कामाला लावणे अवघड असताना अपक्षांना ते जमेल की नाही, हा प्रश्न आहे. दुसरे म्हणजे काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्याशी नामसाधर्म्याचेच आणखी पाच उमेदवार आहेत. अशांमुळे अर्जांची संख्या तेवढी वाढल्याचे दिसते.हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा कल कळण्याइतका मेळ लागणे जरा अवघडच जाते. कारण तीन जिल्ह्यात असलेल्या विस्तारात प्रत्येक तालुक्यातील ८0 ते १८0 गावे अन् प्रत्येक भागाची वेगळी स्थिती हे प्रमुख कारण आहे. ११ तालुक्यांत फिरणेच उमेदवारांना दमछाक करणारे असते. त्यातही सूर्याने डोळे वटारल्याने तर प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंतही जाणे अवघड होत आहे. निवडणुकीच्या खर्चात बसत करण्यासाठी काही उमेदवार गाड्या-घोड्यांची व्यवस्थाही करीत नसल्याचे दिसते. कार्यकर्त्यांनाच तालुक्याला बोलावले जात आहे.तापमानाचा पारा आता ४0 अंशांवरून ४१च्या पुढे सरकत आहे. दोन दिवस रात्रीला ढगाळ वातावरण होते. मात्र दिवसा कडक उन्हाचा तडाखा आहे. १८ तारखेपर्यंत तापमानात वाढीचाच अंदाज हवामान खात्याचा आहे.उन्हामुळे कार्यकर्ते जमत नसल्यामुळे की, अन्य कारणाने यावेळी गर्दीवर कुणाचाच भर दिसत नाही. गर्दी जमली की सीट लागली हे समीकरणच यावेळी दिसत नाही. तर गर्दी न जमविताच विजयाचा मार्ग शोधण्याचा दुसराही फंडा असू शकतो. यावेळी उघड हालचालींपेक्षा पडद्यामागेच राजकारण घडत असल्याचे दिसत आहे. शिवाय दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षात न घेता कामाला लावण्याकडेच उमेदवारांचा कल दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण