शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सिंचन अनुशेषासाठी कयाधू नदीपात्रात संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 16:55 IST

आंदोलकांनी प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याची भूमिका घेतली आहे

कळमनुरी ( हिंगोली ) : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात यावा, कयाधू नदीवर बंधारे बांधावेत, सापळी धरण रद्द करावे, जिल्ह्याला सिंचनासाठी निधी द्यावा, ईसापूर धरणातील पाणी तालुक्याला देण्यात यावे, खरबी बंधारा रद्द करावा आदीं मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्यासह अनेकजण सालेगाव येथील कयाधू नदीपात्रात आज सकाळी १० वाजेपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. परिसरातील गावातील ग्रामस्थांनी या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. 

जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर बंधारे बांधावेत, तसेच खरबी येथे बंधारा बांधून त्याचे पाणी इसापूर धरणात सोडू नये, सापळी धरण रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. माजी खासदार माने यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून परिसरातील दोन गावातील नागरिक दररोज साखळी उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.याप्रसंगी हरिभाऊ झाकलवाडे, डिगांबर कदम, दादाराव मुंडे, सदाशिव चौतमल, वसंतराव पतंगे, रामकिशन ठाकूर, शेषराव पतंगे, गजानन काळे, राम पाटील, जनार्धन गुठ्ठे, आनंद डाढाळे, शिवाजी काळे, शिवाजी गुठ्ठे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. दरम्यान, शासनाकडून जोपर्यंत ठोस उपाययोजना हाती घेतल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुचं राहणार असल्याचे आंदाेलनकर्त्यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याचा निर्णयसिंचनाच्या बाबतीत हिंगोली जिल्ह्यावर वेळोवेळी अन्याय केला जात आहे. सिंचन अनुशेष असतांनाही बंधाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत. एकीकडे बंधारे बांधले जात नाही तर दुसरीकडे कयाधूचे पाणी खरबी बंधारा बांधून इसापूर धरणात सोडण्याचे प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरु आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट होईल. शासनाने सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, या मागणीसाठी बेमुद्दत उपोषण सुरु आहे. निर्णय झाला नाही तर प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्यात येणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीriverनदीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प