शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दुष्काळावर मात करत पपई लागवडीतून मिळवला भरघोस नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:42 IST

यशकथा : पपईतून भरघोस नफा मिळवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

- रामदास टाले (खुडज, जि. हिंगोली) 

खुडज येथील शेतकरी अरुण माधवराव टाले (२९) या तरुण शेतकऱ्याने दुष्काळावर मात करीत पपईतून भरघोस नफा मिळवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

सोलापूर येथील खाजगी नर्सरीतून मार्च २०१८ मध्ये तायवान ७८६ पपईची प्रतिझाड १२ रुपयांप्रमाणे २ हजार रोपे खरेदी केली. नर्सरी चालकाने घरपोच रोपे आणून दिली. ८ बाय ६ फूट अंतरावर बेड तयार करून ठिबकवर रोपांची लागवड केली. दोन एकरासाठी रोपे व ठिबक मिळून ८० हजारांचा खर्च झाला. ठिंबकद्वारे पाण्याचे योग्य नियोजन ठेवत, पाण्यात विरघळणाऱ्या खते, सूक्ष्म पोषकद्रव्ये ठिबकद्वारे दिली. त्यानंतर पपईची झाडे वाढीस लागली

अन् १ जून रोजी गारपिटीने पपईची बाग झोडपून निघाली. गारपिटीने बागेचे मोठे नुकसान झाले. एकही पान झाडावर शिल्लक नव्हते. तरीही अरुणने परिश्रमातून जिद्दीने बाग उभी केली. त्याच्या जिद्दीसमोर शेवटी निसर्गालाही हात टेकावे लागले. ते संकट दूर झाले आणि दुष्काळाच्या संकटाने तोंड वर काढले. विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठल्याने बागेसाठी पाणी पुरेल का? हा प्रश्न सतावू लागला. परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. बागेला पाणी देण्यासाठी ठिबकची व्यवस्था असल्याने या संकटावरही अरुणने मात केली.

बागेला एक दिवसाआड दोन ते तीन तास पाणी दिले जाते. याउलट मोकळे पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय जमिनीतील पोषकद्रव्येही वाहून जातात. जमीन नापिक बनण्याचे हेच मुख्य कारण असल्याचे अरुण सांगतो.लागवडीनंतर १५ दिवसाला ठिबकद्वारे १ किलो ह्युमिक अ‍ॅसिड व १९:१९:१९ हे पाण्यात विरघळणारे खत २५ किलो ८ दिवसांच्या अंतराने दिले. त्यानंतर १३:४०:१३ हे खत १० किलो ८ दिवसांच्या अंतराने दिले. फळांची योग्य वाढ झाल्यानंतर फळाला रंग येण्यासाठी ०:५२:३४ व ०:०:५० हे खत १५ किलो आठ दिवसांच्या अंतराने देण्यात येत आहे.

सद्य:स्थितीत पपईची बाग बहरली असून, एका झाडावर ७० ते ८० पपई लगडल्या आहेत. एका झाडावरील वजन साधारणत: एक ते दीड क्विं टलपर्यंत आहे. पहिल्या तोडणीत व्यापाऱ्यांनी जागेवरच १२ रुपये प्रतिकिलोने तीन टन पपई शेतातूनच खरेदी केली. दुसऱ्या तोडणीला ८ टनांपर्यंत पपई निघणार असून, १५ रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची अपेक्षा अरुणने व्यक्त केली आहे. पाणी शेवटपर्यंत टिकले तर  शेवटची तोडणी जून महिन्यापर्यंत चालू शकते, तर ५० ते ६० टनांपर्यंत उत्पन्न शेवटपर्यंत मिळणार आहे. यातून ७ ते ८ लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा टाले यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबत केळी, हळद, हरभरा या पिकांतून १० लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे अरुण सांगतो. 

दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडल्याने पारंपरिक शेतीवर याचा गंभीर परिणाम होत आहे.  कधी-कधी तर सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर या पिकांतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक असल्याचे अरुण सांगतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी