शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर मात करत पपई लागवडीतून मिळवला भरघोस नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:42 IST

यशकथा : पपईतून भरघोस नफा मिळवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

- रामदास टाले (खुडज, जि. हिंगोली) 

खुडज येथील शेतकरी अरुण माधवराव टाले (२९) या तरुण शेतकऱ्याने दुष्काळावर मात करीत पपईतून भरघोस नफा मिळवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

सोलापूर येथील खाजगी नर्सरीतून मार्च २०१८ मध्ये तायवान ७८६ पपईची प्रतिझाड १२ रुपयांप्रमाणे २ हजार रोपे खरेदी केली. नर्सरी चालकाने घरपोच रोपे आणून दिली. ८ बाय ६ फूट अंतरावर बेड तयार करून ठिबकवर रोपांची लागवड केली. दोन एकरासाठी रोपे व ठिबक मिळून ८० हजारांचा खर्च झाला. ठिंबकद्वारे पाण्याचे योग्य नियोजन ठेवत, पाण्यात विरघळणाऱ्या खते, सूक्ष्म पोषकद्रव्ये ठिबकद्वारे दिली. त्यानंतर पपईची झाडे वाढीस लागली

अन् १ जून रोजी गारपिटीने पपईची बाग झोडपून निघाली. गारपिटीने बागेचे मोठे नुकसान झाले. एकही पान झाडावर शिल्लक नव्हते. तरीही अरुणने परिश्रमातून जिद्दीने बाग उभी केली. त्याच्या जिद्दीसमोर शेवटी निसर्गालाही हात टेकावे लागले. ते संकट दूर झाले आणि दुष्काळाच्या संकटाने तोंड वर काढले. विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठल्याने बागेसाठी पाणी पुरेल का? हा प्रश्न सतावू लागला. परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. बागेला पाणी देण्यासाठी ठिबकची व्यवस्था असल्याने या संकटावरही अरुणने मात केली.

बागेला एक दिवसाआड दोन ते तीन तास पाणी दिले जाते. याउलट मोकळे पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय जमिनीतील पोषकद्रव्येही वाहून जातात. जमीन नापिक बनण्याचे हेच मुख्य कारण असल्याचे अरुण सांगतो.लागवडीनंतर १५ दिवसाला ठिबकद्वारे १ किलो ह्युमिक अ‍ॅसिड व १९:१९:१९ हे पाण्यात विरघळणारे खत २५ किलो ८ दिवसांच्या अंतराने दिले. त्यानंतर १३:४०:१३ हे खत १० किलो ८ दिवसांच्या अंतराने दिले. फळांची योग्य वाढ झाल्यानंतर फळाला रंग येण्यासाठी ०:५२:३४ व ०:०:५० हे खत १५ किलो आठ दिवसांच्या अंतराने देण्यात येत आहे.

सद्य:स्थितीत पपईची बाग बहरली असून, एका झाडावर ७० ते ८० पपई लगडल्या आहेत. एका झाडावरील वजन साधारणत: एक ते दीड क्विं टलपर्यंत आहे. पहिल्या तोडणीत व्यापाऱ्यांनी जागेवरच १२ रुपये प्रतिकिलोने तीन टन पपई शेतातूनच खरेदी केली. दुसऱ्या तोडणीला ८ टनांपर्यंत पपई निघणार असून, १५ रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची अपेक्षा अरुणने व्यक्त केली आहे. पाणी शेवटपर्यंत टिकले तर  शेवटची तोडणी जून महिन्यापर्यंत चालू शकते, तर ५० ते ६० टनांपर्यंत उत्पन्न शेवटपर्यंत मिळणार आहे. यातून ७ ते ८ लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा टाले यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबत केळी, हळद, हरभरा या पिकांतून १० लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे अरुण सांगतो. 

दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडल्याने पारंपरिक शेतीवर याचा गंभीर परिणाम होत आहे.  कधी-कधी तर सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर या पिकांतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक असल्याचे अरुण सांगतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी