शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर मात करत पपई लागवडीतून मिळवला भरघोस नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:42 IST

यशकथा : पपईतून भरघोस नफा मिळवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

- रामदास टाले (खुडज, जि. हिंगोली) 

खुडज येथील शेतकरी अरुण माधवराव टाले (२९) या तरुण शेतकऱ्याने दुष्काळावर मात करीत पपईतून भरघोस नफा मिळवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

सोलापूर येथील खाजगी नर्सरीतून मार्च २०१८ मध्ये तायवान ७८६ पपईची प्रतिझाड १२ रुपयांप्रमाणे २ हजार रोपे खरेदी केली. नर्सरी चालकाने घरपोच रोपे आणून दिली. ८ बाय ६ फूट अंतरावर बेड तयार करून ठिबकवर रोपांची लागवड केली. दोन एकरासाठी रोपे व ठिबक मिळून ८० हजारांचा खर्च झाला. ठिंबकद्वारे पाण्याचे योग्य नियोजन ठेवत, पाण्यात विरघळणाऱ्या खते, सूक्ष्म पोषकद्रव्ये ठिबकद्वारे दिली. त्यानंतर पपईची झाडे वाढीस लागली

अन् १ जून रोजी गारपिटीने पपईची बाग झोडपून निघाली. गारपिटीने बागेचे मोठे नुकसान झाले. एकही पान झाडावर शिल्लक नव्हते. तरीही अरुणने परिश्रमातून जिद्दीने बाग उभी केली. त्याच्या जिद्दीसमोर शेवटी निसर्गालाही हात टेकावे लागले. ते संकट दूर झाले आणि दुष्काळाच्या संकटाने तोंड वर काढले. विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठल्याने बागेसाठी पाणी पुरेल का? हा प्रश्न सतावू लागला. परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. बागेला पाणी देण्यासाठी ठिबकची व्यवस्था असल्याने या संकटावरही अरुणने मात केली.

बागेला एक दिवसाआड दोन ते तीन तास पाणी दिले जाते. याउलट मोकळे पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय जमिनीतील पोषकद्रव्येही वाहून जातात. जमीन नापिक बनण्याचे हेच मुख्य कारण असल्याचे अरुण सांगतो.लागवडीनंतर १५ दिवसाला ठिबकद्वारे १ किलो ह्युमिक अ‍ॅसिड व १९:१९:१९ हे पाण्यात विरघळणारे खत २५ किलो ८ दिवसांच्या अंतराने दिले. त्यानंतर १३:४०:१३ हे खत १० किलो ८ दिवसांच्या अंतराने दिले. फळांची योग्य वाढ झाल्यानंतर फळाला रंग येण्यासाठी ०:५२:३४ व ०:०:५० हे खत १५ किलो आठ दिवसांच्या अंतराने देण्यात येत आहे.

सद्य:स्थितीत पपईची बाग बहरली असून, एका झाडावर ७० ते ८० पपई लगडल्या आहेत. एका झाडावरील वजन साधारणत: एक ते दीड क्विं टलपर्यंत आहे. पहिल्या तोडणीत व्यापाऱ्यांनी जागेवरच १२ रुपये प्रतिकिलोने तीन टन पपई शेतातूनच खरेदी केली. दुसऱ्या तोडणीला ८ टनांपर्यंत पपई निघणार असून, १५ रुपये प्रतिकिलो दर मिळण्याची अपेक्षा अरुणने व्यक्त केली आहे. पाणी शेवटपर्यंत टिकले तर  शेवटची तोडणी जून महिन्यापर्यंत चालू शकते, तर ५० ते ६० टनांपर्यंत उत्पन्न शेवटपर्यंत मिळणार आहे. यातून ७ ते ८ लाखांचा नफा मिळण्याची अपेक्षा टाले यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबत केळी, हळद, हरभरा या पिकांतून १० लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे अरुण सांगतो. 

दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडल्याने पारंपरिक शेतीवर याचा गंभीर परिणाम होत आहे.  कधी-कधी तर सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर या पिकांतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक असल्याचे अरुण सांगतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी