शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

इंचा येथील पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:02 IST

तालुक्यातील इंचा येथे १९ मे रोजी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील इंचा येथे १९ मे रोजी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला.हिंगोली शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या इंचा येथे पाणीटंचाईने कळस गाठला आहे. याबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाला निवेदने देवूनही काहीच उपाययोजना झाली नाही. ग्रामस्थांनी शेवटी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तरीही फारसा फरक पडला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांना विचारणा केली तर तेही उडवाउडवीची उत्तरे देत होते. तहसीलमध्ये जावूनही काहीच फरक पडला नाही. शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय राऊत, रिपाइंचे सर्कल अध्यक्ष सिद्धार्थ चक्के, ग्रामस्थ कैलास चक्के यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनात महिला व लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येत होते. ग्रामस्थ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत असून गावातील पाणीप्रश्न जाणीवपूर्वक सोडविला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. सलग तीन वर्षांपासून पाणीप्रश्न गंभीर बनला. परंतु हा प्रश्न सोडविण्यासाठी ना ग्रामपंचायत पुढाकार घेतेय, ना प्रशासन. त्यामुळे ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई असली तरीही प्रशासनाने एकाही बोअर अधिग्रहण केले नाही यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले होते. काही महिलांनी तर चक्क ग्रामपंचायतसमोर भांडीच आदळली. शासन विरोधी घोषणांचा पाऊस सुरू होता. गावातील चिमुकलेही सहभागी झाली होते. हा मोर्चा गावातील मुख्य मार्गावरून ग्रामपंचायतीवर धडकला. मोर्चामुळे गाव ओस पडले होते. सार्वजनिक बोअरची विद्युत मोटरही सरपंचांच्या बोअरमध्ये असल्याचे महिलांनी सांगितले. सरपंचाच्या घरी पाणी आणण्यासाठी गेल्यास अनेकदा उलट उत्तरे ऐकावयास मिळाल्याचे महिला सांगत होत्या.आश्वासनानंतर आंदोलन मागेकेवळ बॉडी बदलली म्हणून दोन वर्षांपासून माझ्या बोअरवर अधिग्रहण केले जात नाही. तसे असूनही मी ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करतो. प्रशासनाने गावापर्यंत पाईप लाईन करून दिली. तर पाणीपुरवठ्याची जबाबदारी मी घेईन, असे माजी सरपंच गोविंदराव ठाकरे यांनी सांगितले. ग्रा. पं. सदस्य घागर मोर्चा घेऊन येणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून आले. घरातील सर्व कामे सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे शोभाबाई चक्के यांनी सांगितले. मोर्चेकरी बराचवेळ ग्रा. पं. समोर ताटकळत बसले होते. दोन तासानंतर प्रशासकीय अधिकारी आले अन् त्यांनी ग्रामस्थांना तुमच्या मागणीनुसार पाणी देण्याचे आश्वासन दिले.

 

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाई