शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

इंचा येथील पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:02 IST

तालुक्यातील इंचा येथे १९ मे रोजी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील इंचा येथे १९ मे रोजी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला.हिंगोली शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या इंचा येथे पाणीटंचाईने कळस गाठला आहे. याबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाला निवेदने देवूनही काहीच उपाययोजना झाली नाही. ग्रामस्थांनी शेवटी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तरीही फारसा फरक पडला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांना विचारणा केली तर तेही उडवाउडवीची उत्तरे देत होते. तहसीलमध्ये जावूनही काहीच फरक पडला नाही. शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय राऊत, रिपाइंचे सर्कल अध्यक्ष सिद्धार्थ चक्के, ग्रामस्थ कैलास चक्के यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनात महिला व लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येत होते. ग्रामस्थ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत असून गावातील पाणीप्रश्न जाणीवपूर्वक सोडविला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. सलग तीन वर्षांपासून पाणीप्रश्न गंभीर बनला. परंतु हा प्रश्न सोडविण्यासाठी ना ग्रामपंचायत पुढाकार घेतेय, ना प्रशासन. त्यामुळे ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई असली तरीही प्रशासनाने एकाही बोअर अधिग्रहण केले नाही यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले होते. काही महिलांनी तर चक्क ग्रामपंचायतसमोर भांडीच आदळली. शासन विरोधी घोषणांचा पाऊस सुरू होता. गावातील चिमुकलेही सहभागी झाली होते. हा मोर्चा गावातील मुख्य मार्गावरून ग्रामपंचायतीवर धडकला. मोर्चामुळे गाव ओस पडले होते. सार्वजनिक बोअरची विद्युत मोटरही सरपंचांच्या बोअरमध्ये असल्याचे महिलांनी सांगितले. सरपंचाच्या घरी पाणी आणण्यासाठी गेल्यास अनेकदा उलट उत्तरे ऐकावयास मिळाल्याचे महिला सांगत होत्या.आश्वासनानंतर आंदोलन मागेकेवळ बॉडी बदलली म्हणून दोन वर्षांपासून माझ्या बोअरवर अधिग्रहण केले जात नाही. तसे असूनही मी ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करतो. प्रशासनाने गावापर्यंत पाईप लाईन करून दिली. तर पाणीपुरवठ्याची जबाबदारी मी घेईन, असे माजी सरपंच गोविंदराव ठाकरे यांनी सांगितले. ग्रा. पं. सदस्य घागर मोर्चा घेऊन येणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून आले. घरातील सर्व कामे सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे शोभाबाई चक्के यांनी सांगितले. मोर्चेकरी बराचवेळ ग्रा. पं. समोर ताटकळत बसले होते. दोन तासानंतर प्रशासकीय अधिकारी आले अन् त्यांनी ग्रामस्थांना तुमच्या मागणीनुसार पाणी देण्याचे आश्वासन दिले.

 

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाई