शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतील गोरेगावात शेतकऱ्यांनी घातले राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:34 IST

‘अन्नत्याग’ आंदोलनाच्या तिसरा दिवस

हिंगोली  : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून,  सरकार मात्र सदर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही. मध्यंतरी बँककर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीचा पवित्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, १० डिसेंबर रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य शासनाचे श्राद्ध घालीत निषेध नोंदविण्यात आला आहे.

गत चार ते पाच वर्षापासून सततच्या दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागत असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकरी आत्महत्याच्या घटनाही घडत आहेत. यंदा खरीप हंगामात उत्पन्न घटीचा फटका बसला असताना पिकविमा किंवा कुठलीच शासकीय अनुदान मदतही मिळाली नाही. शेतमालाला योग्य भावही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. आमची किडनी लिव्हर, डोळे आदी अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करीत आंदोलनासाठी मुंबई गाठली होती. परंतु शासनाकडून दखल घेण्यात आली नाही.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर ८ डिसेंबरपासून कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरु आहे. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांसह गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली जात आहेत. रस्त्यावर दूध सांडून शासनाचा निषेध नोंदवित अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. १० डिसेंबर रोजी येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता.  प्रतिमेसमोर अगरबत्ती, कापूर, मेणबत्ती दिवे जाळीत नैवेद्य फळांचा भोग चढवीत आंदोलक शेतकऱ्यांकडून राज्य शासनाचे श्राद्ध घालण्यात आले. प्रसंगी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, मदन कावरखे, अक्षय पाटील, सुनील मधुरवाड, रामेश्वर कावरखे, संजय मुळे आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

सरकार संवेदनशील नाही ...

सतत दुष्काळ, उत्पन्नघटीचा सामना करावा लागत असताना आर्थिक विवंचणेत सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्याचा पर्याय निवडावा लागत आहे. याबाबत अवयव विक्रीस काढूनही शासन दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्न बाबत सरकार जराही संवेदशील नाही. त्यामुळे राज्य सरकारचे श्राद्ध घालण्यात आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHingoliहिंगोली