शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

हिंगोलीतील गोरेगावात शेतकऱ्यांनी घातले राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:34 IST

‘अन्नत्याग’ आंदोलनाच्या तिसरा दिवस

हिंगोली  : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून,  सरकार मात्र सदर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही. मध्यंतरी बँककर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीचा पवित्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, १० डिसेंबर रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य शासनाचे श्राद्ध घालीत निषेध नोंदविण्यात आला आहे.

गत चार ते पाच वर्षापासून सततच्या दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागत असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकरी आत्महत्याच्या घटनाही घडत आहेत. यंदा खरीप हंगामात उत्पन्न घटीचा फटका बसला असताना पिकविमा किंवा कुठलीच शासकीय अनुदान मदतही मिळाली नाही. शेतमालाला योग्य भावही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. आमची किडनी लिव्हर, डोळे आदी अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करीत आंदोलनासाठी मुंबई गाठली होती. परंतु शासनाकडून दखल घेण्यात आली नाही.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर ८ डिसेंबरपासून कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरु आहे. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांसह गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली जात आहेत. रस्त्यावर दूध सांडून शासनाचा निषेध नोंदवित अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. १० डिसेंबर रोजी येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता.  प्रतिमेसमोर अगरबत्ती, कापूर, मेणबत्ती दिवे जाळीत नैवेद्य फळांचा भोग चढवीत आंदोलक शेतकऱ्यांकडून राज्य शासनाचे श्राद्ध घालण्यात आले. प्रसंगी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, मदन कावरखे, अक्षय पाटील, सुनील मधुरवाड, रामेश्वर कावरखे, संजय मुळे आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

सरकार संवेदनशील नाही ...

सतत दुष्काळ, उत्पन्नघटीचा सामना करावा लागत असताना आर्थिक विवंचणेत सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्याचा पर्याय निवडावा लागत आहे. याबाबत अवयव विक्रीस काढूनही शासन दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्न बाबत सरकार जराही संवेदशील नाही. त्यामुळे राज्य सरकारचे श्राद्ध घालण्यात आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHingoliहिंगोली