शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

हिंगोलीतील गोरेगावात शेतकऱ्यांनी घातले राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:34 IST

‘अन्नत्याग’ आंदोलनाच्या तिसरा दिवस

हिंगोली  : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून,  सरकार मात्र सदर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही. मध्यंतरी बँककर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीचा पवित्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, १० डिसेंबर रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य शासनाचे श्राद्ध घालीत निषेध नोंदविण्यात आला आहे.

गत चार ते पाच वर्षापासून सततच्या दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागत असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकरी आत्महत्याच्या घटनाही घडत आहेत. यंदा खरीप हंगामात उत्पन्न घटीचा फटका बसला असताना पिकविमा किंवा कुठलीच शासकीय अनुदान मदतही मिळाली नाही. शेतमालाला योग्य भावही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. आमची किडनी लिव्हर, डोळे आदी अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करीत आंदोलनासाठी मुंबई गाठली होती. परंतु शासनाकडून दखल घेण्यात आली नाही.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर ८ डिसेंबरपासून कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरु आहे. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांसह गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली जात आहेत. रस्त्यावर दूध सांडून शासनाचा निषेध नोंदवित अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. १० डिसेंबर रोजी येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता.  प्रतिमेसमोर अगरबत्ती, कापूर, मेणबत्ती दिवे जाळीत नैवेद्य फळांचा भोग चढवीत आंदोलक शेतकऱ्यांकडून राज्य शासनाचे श्राद्ध घालण्यात आले. प्रसंगी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, मदन कावरखे, अक्षय पाटील, सुनील मधुरवाड, रामेश्वर कावरखे, संजय मुळे आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

सरकार संवेदनशील नाही ...

सतत दुष्काळ, उत्पन्नघटीचा सामना करावा लागत असताना आर्थिक विवंचणेत सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्याचा पर्याय निवडावा लागत आहे. याबाबत अवयव विक्रीस काढूनही शासन दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्न बाबत सरकार जराही संवेदशील नाही. त्यामुळे राज्य सरकारचे श्राद्ध घालण्यात आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHingoliहिंगोली