शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मन शांत ठेवल्यास रागावर नियंत्रण निश्चितच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:33 AM

माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. असे मत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी सी. एल. पठाण यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. असे मत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी सी. एल. पठाण यांनी व्यक्त केले.बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक अनुभव आले आहेत. सेवाकाळात कर्जवसुलीची जबाबदारी पार पाडताना रागाचा अनुभवही आला आहे. बँकेची वसुली सक्तीने किंवा राग व्यक्त करून नाही तर गोडीने व युक्तीने केली पाहिजे. विशेष म्हणजे कर्तव्य बजावताना सेवाकाळात वरिष्ठांचे राग अनुभवल्याचे सी. एल. पठाण यांनी सांगितले. तसेच रागाला प्रेमाणे उत्तर दिल्यास राग करणारे अधिकारी पश्चातापाने व्यथीत होतात. बँकेतील कर्तव्य बजावत असताना कामचुकार करणारे प्रेमाच्या गोडव्याने जवळ येवून नतमस्तक झालेले मी पाहिले आहेत. राग व द्वेष मनात न आणल्यास कुठलीही कामे लवकर होतात. शिवाय अडथळ्यांनाही थारा नसतो. प्रत्येकांनी जर स्वभावात प्रेमाची सांगड घातल्यास जीवन सुखी समाधानी बनते.निवृत्तीनंतर अजूनही ग्रामीण शेतकरी वर्ग भेटतात. त्यावेळी त्यांचे प्रेम कुटूंबातील सदस्याप्रमाणे सुखदुखाच्या शब्दांनी भारावून जाणारे असते. त्यांच्या त्या प्रेमळ सहानुभूतीने मन आनंदून जाते. त्यामुळे प्रत्येकांनीच राग, अहंकार, द्वेष याला हद्दपार करून जीवन सुखीमय करावे. शिवाय प्रमेळ स्वभावामुळेच कर्तव्य पार पाडताना अडी-अडचणींचा सामना करावा लागला नाही.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक