शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

शेतकऱ्यांना चार दिवसांत पिकविमा दिला नाही तर गाठ माझ्याशी, आमदार बांगरांचा इशारा

By विजय पाटील | Published: March 06, 2024 4:40 PM

आमदार संतोष बांगर पोहचले थेट कृषि अधीक्षक कार्यालयात 

हिंगोली : चुकीचा अहवाल दिल्यामुळे आधीच शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिला आहे. मात्र ज्यांनी तक्रार केली अशा शेतकऱ्यांनाही विमा का दिला जात नाही. चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे न दिल्यास शिवसेनास्टाईल आंदोलनाचा इशारा आमदार संतोष बांगर यांनी दिला.

६ मार्च रोजी आ.संतोष बांगर यांनी हिंगोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात भेट दिली. कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांच्याशी त्यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी आमदार बांगर म्हणाले, शेतकऱ्यांचा पीकविमा तर कृषी कार्यालयाच्या चुकीमुळे मिळाला नाही. आता तक्रार केलेल्या शेतकऱ्यांबाबतही निर्णय का घेतला जात नाही. ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीकविमा कंपनीकडे तक्रार केली, त्यांनाही पीकविमा न देण्यामागची कारणे काय आहेत? असा सवाल केला.

दोन लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याची ऑनलाईन तक्रार करूनही मदत मिळत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे दुश्मन आहात का? अशा शब्दांत सुनावले.येत्या आठ दिवसांत रक्कम मिळेल, असे घोरपडे यांनी सांगितले. मात्र वारंवार आम्हाला तक्रारी कराव्या लागू नयेत. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तेही कृषी अधीक्षकांनी चुकीचा अहवाल दिल्याचे सांगतात. त्यावर १०० टक्के रक्कम अॅडव्हान्स देण्याचा प्रस्ताव होता, असे घोरपडे म्हणाले. मात्र त्यात काहीच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची राखरांगोळी झाली. आता तक्रार करणाऱ्यांना चार दिवसांत रक्कम मिळाली नाही तर गाठ माझ्याशी आहे, असेही बांगर म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र