शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result : हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच सरस; निकाल ८८.२३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:21 IST

हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ४४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८0 जणांनी परीक्षा दिली.

ठळक मुद्देपुरवणी परीक्षेचा निकाल ३९.५८ टक्केतालुक्यांमधून सेनगाव अव्वल

हिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.२४ टक्के लागला असून औरंगाबाद विभागीय मंडळात जिल्हा जालना व बीडपाठोपाठ तिसऱ्या स्थानी आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे.

हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ४४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८0 जणांनी परीक्षा दिली. यातील १७१ विशेष प्राविण्यात, १८२९ प्रथम श्रेणीत, २१३0 द्वितीय श्रेणीत तर अवघे ४८ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ९५.३९ टक्के लागला आहे. कला शाखेचे ६७५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. यापैकी ६६७0 जणांनी परीक्षा दिली. यातील ३८१ विशेष प्राविण्यात, २७१५ प्रथम श्रेणीत, २३६८ द्वितीय श्रेणीत तर ९१ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ८३.२८ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेसाठी ९0४ जणांनी अर्ज भरले होते. यापैकी ९0२ जणांनी परीक्षा दिली. २२0 जण विशेष प्राविण्यात, ४३३ प्रथम श्रेणीत, २0६ द्वितीय श्रेणीत, ८ काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा सर्वाधिक ९६.१२ टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला ३२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी ३२८ जणांनी परेक्षा दिली. १५ विशेष प्राविण्यात, १५३ प्रथम तर १0५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ८३.२३ टक्के लागला.

पुरवणी परीक्षेचा निकाल ३९.५८ टक्केहिंगोली जिल्ह्यात पुरवणी परीक्षेस विज्ञान शाखेचे २४१ पैकी २३८ जण परीक्षेस बसले. २ प्राविण्यात, ४८ प्रथम श्रेणीत, ३२ द्वितीय तर ६८ काठावर उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या सर्व ५६३ जणांनी परीक्षा दिली. यापैकी ३ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय तर १५८ काठावर उत्तीर्ण झाले. वाणिज्यच्या १२ ही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ५ काठावर उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य अभ्यासक्रमांच्या ३६ पैकी ११ जणांना काठावर यश मिळाले.

मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का जास्तमुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का यंदाही मुलांपेक्षा जास्तच आहे. यंदा जिल्ह्यात सर्व शाखांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार ४0५ आहे. यापैकी १२२८0 जणांनी परीक्षा दिली असून १0८७३ जण उत्तीर्ण झाले. यापैकी ५८९३ मुले तर ४९८0 मुली आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.९७ तर मुलींचे ९३.१७ आहे.

तालुक्यांमधून सेनगाव अव्वलतालुकानिहाय निकालाचा विचार केला तर सेनगाव तालुका अव्वल राहिला आहे. हिंगोली तालुक्यात नोंदणी केलेल्या २८५0 पैकी २८१२ जणांनी परीक्षा दिली. यातील २३९१ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ८५.0३ टक्के आहे. कळमनुरी तालुक्यात नोंदणी केलेल्या २५७२ पैकी २५५८ जणांनी परीक्षा दिली. यातील २२८९ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.४८ टक्के आहे. वसमत तालुक्यात नोंदणी केलेल्या ३९२५ पैकी ३८८७ जणांनी परीक्षा दिली. यापैकी ३४७६ जण उत्तीर्ण झाले.हे प्रमाण ८९.४३ टक्के आहे. सेनगाव तालुक्यात नोंदणी केलेल्या १६८३ पैकी १६६१ जणांनी परीक्षा दिली. तर १४९५ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९0.0१ टक्के असून जिल्ह्यात सर्वाधिक आहे. औंढा तालुक्यात नोंदणीच्या १३७५  पैकी १३६२ जणांनी परीक्षा दिली. यापैकी १२२२ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.७२ टक्के आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीHingoliहिंगोली