शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

HSC Result : हिंगोली जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच सरस; निकाल ८८.२३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:21 IST

हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ४४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८0 जणांनी परीक्षा दिली.

ठळक मुद्देपुरवणी परीक्षेचा निकाल ३९.५८ टक्केतालुक्यांमधून सेनगाव अव्वल

हिंगोली : जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.२४ टक्के लागला असून औरंगाबाद विभागीय मंडळात जिल्हा जालना व बीडपाठोपाठ तिसऱ्या स्थानी आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे.

हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या विज्ञान शाखेसाठी ४४१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४३८0 जणांनी परीक्षा दिली. यातील १७१ विशेष प्राविण्यात, १८२९ प्रथम श्रेणीत, २१३0 द्वितीय श्रेणीत तर अवघे ४८ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ९५.३९ टक्के लागला आहे. कला शाखेचे ६७५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. यापैकी ६६७0 जणांनी परीक्षा दिली. यातील ३८१ विशेष प्राविण्यात, २७१५ प्रथम श्रेणीत, २३६८ द्वितीय श्रेणीत तर ९१ जण काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ८३.२८ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेसाठी ९0४ जणांनी अर्ज भरले होते. यापैकी ९0२ जणांनी परीक्षा दिली. २२0 जण विशेष प्राविण्यात, ४३३ प्रथम श्रेणीत, २0६ द्वितीय श्रेणीत, ८ काठावर उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा सर्वाधिक ९६.१२ टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाला ३२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यापैकी ३२८ जणांनी परेक्षा दिली. १५ विशेष प्राविण्यात, १५३ प्रथम तर १0५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ८३.२३ टक्के लागला.

पुरवणी परीक्षेचा निकाल ३९.५८ टक्केहिंगोली जिल्ह्यात पुरवणी परीक्षेस विज्ञान शाखेचे २४१ पैकी २३८ जण परीक्षेस बसले. २ प्राविण्यात, ४८ प्रथम श्रेणीत, ३२ द्वितीय तर ६८ काठावर उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या सर्व ५६३ जणांनी परीक्षा दिली. यापैकी ३ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय तर १५८ काठावर उत्तीर्ण झाले. वाणिज्यच्या १२ ही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ५ काठावर उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य अभ्यासक्रमांच्या ३६ पैकी ११ जणांना काठावर यश मिळाले.

मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का जास्तमुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का यंदाही मुलांपेक्षा जास्तच आहे. यंदा जिल्ह्यात सर्व शाखांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार ४0५ आहे. यापैकी १२२८0 जणांनी परीक्षा दिली असून १0८७३ जण उत्तीर्ण झाले. यापैकी ५८९३ मुले तर ४९८0 मुली आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.९७ तर मुलींचे ९३.१७ आहे.

तालुक्यांमधून सेनगाव अव्वलतालुकानिहाय निकालाचा विचार केला तर सेनगाव तालुका अव्वल राहिला आहे. हिंगोली तालुक्यात नोंदणी केलेल्या २८५0 पैकी २८१२ जणांनी परीक्षा दिली. यातील २३९१ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे ८५.0३ टक्के आहे. कळमनुरी तालुक्यात नोंदणी केलेल्या २५७२ पैकी २५५८ जणांनी परीक्षा दिली. यातील २२८९ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.४८ टक्के आहे. वसमत तालुक्यात नोंदणी केलेल्या ३९२५ पैकी ३८८७ जणांनी परीक्षा दिली. यापैकी ३४७६ जण उत्तीर्ण झाले.हे प्रमाण ८९.४३ टक्के आहे. सेनगाव तालुक्यात नोंदणी केलेल्या १६८३ पैकी १६६१ जणांनी परीक्षा दिली. तर १४९५ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९0.0१ टक्के असून जिल्ह्यात सर्वाधिक आहे. औंढा तालुक्यात नोंदणीच्या १३७५  पैकी १३६२ जणांनी परीक्षा दिली. यापैकी १२२२ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.७२ टक्के आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीHingoliहिंगोली