शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:30 AM

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. रात्रंदिवस काम करावे लागत असल्याने ...

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. रात्रंदिवस काम करावे लागत असल्याने पोलीस व आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. एरवी योग शिबिरे, मेडिटेशन शिबिरे घेतली जात असली तरी कोरोनाकाळात मात्र त्यांना खो बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मासिक थकवा कसा घालविणार, हा प्रश्न निर्माण होत आहे.

कोरोना रोखण्यासाठी सर्वच विभागांचे कर्मचारी, अधिकारी पुढाकार घेत असले तरी यात आरोग्य व पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचे काम वाढले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बाध घातल्याने या नियमांची अमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आली आहे. यातून ताणतणाव वाढत असून मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. दोन्ही विभागांच्या वतीने योग शिबिरे, ध्यानधारणा शिबिरे घेतली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र कोरोनाच्या काळात या शिबिराला खो बसल्याने दिसत आहे. त्यामुळे कोरोनाकाळात पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील एकूण पोलीस - १०८९

पोलीस अधिकारी - ७८

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी - ९३१

डॉक्टर्स - १५०

प्रतिक्रिया

पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी योगा, ध्यानधारणा शिबिरे घेतली जातात. मात्र पोलीस ठाणे स्तरावर ही शिबिरे झाल्यास जास्त फायदा होईल. सध्या कोरोनामुळे काम वाढले असून कुटुंबीयांना वेळही देता येत नाही. त्यामुळे मानसिक थकवा जाणवत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

कोरोनामुळे कामाचा व्याप वाढला आहे. यामुळे कुटुंबांना वेळ देता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरविला जातो. तसेच योग शिबिरे, ध्यानशिबिरेही घेतली जातात. मात्र त्यात सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग क्वचित असतो, अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कामही वाढले आहे. यात कुटुंबाला वेळ देताना व आरोग्य सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नियमित योगा शिबिरे, मेडिटेशन शिबिरे घेतल्यास कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असे मत एका आरोग्य कर्मचाऱ्याने व्यक्त केले.

कोरोनामुळे कुुटुंबाला वेळही देता येत नाही. जास्त वेळ दवाखान्यातच जात असल्याने मानसिक थकवा जाणवत आहे. मात्र रुग्णांना उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याचे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरविला जातो. यातून त्यांच्या समस्याचे निराकरण केले जाते. तसेच योग शिबिर व तज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबिरांतून कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

- यशवंत काळे, अप्पर पोलीस अधीक्षक, हिंगोली

आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित मेडिटेशन शिबिरे घेतली जातात. तसेच सोशल वर्करमार्फत कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जाते. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक