शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

हिंगोली तालुक्यातही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:29 AM

तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील काही भागात शेतात कयाधूचे पाणी मोठ्या प्रमाणात तर काही भागात अगदी काठावरच्या शेतात पाणी घुसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला.हिंगोली तालुक्यात हिंगोलीसह समगा, हिंगणी, कोथळज, दुर्गधामणी, मालवाडी, चिखलवाडी आदी गावांच्या शेतशिवारात कयाधू नदीचे पाणी घुसल्याने शेतीचे नुकसान झाले. हिंगोली शहरापर्यंत कयाधूचे पाणी पात्रातून वाहात होते. मात्र पुढे गेल्यानंतर अनेक मोठे ओढे या नदीत मिसळतात. त्यामुळे पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. तरीही या भागातील पाच ते सहा गावांतील शेतशिवारात कमी-अधिक प्रमाणात या पुराचे पाणी घुसले होते.हिंगोली तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी माजी सभापती दिलीप घुगे यांनी केले. तर औंढा तालुक्यातील पूर, कंजारा आदी परिसरातील गावांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नामदेव कल्याणकर यांनी केली.पिके उन्मळताहेतलोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तर आहेच. सोबत जोमात आलेली पिके सततच्या पावसाने उन्मळून जातात की काय? याची धाकधूकही आहे. जास्त पाऊस व्हावा व धरण भरावीत ही अपेक्षाही आहे. मात्र जादा पावसाने सुगी हातची जावू नये, अशीही प्रार्थना आहे.वसमत तालुक्यात गेल्या तीन वर्षांत कमी पाऊस व दुष्काळसदृष्य स्थिती अनुभवली आहे. यावर्षी सुगी चांगली आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून वरूणराजा पुन्हा परतला. त्यामुळे पिकांवर पडलेला ताण हलका झाला. पिके पुन्हा तरारली. मात्र आता सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने नदी, नाले, तलाव भरून वाहत आहेत. त्याचा फटकाही शेती शेतकऱ्यांला बसत आहे.सतत तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने आसना, उघडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी शेजारील गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागण्याची भिती आहे.कौठा, कुरूंदा, किन्होळा आदी गावातील नदी किनाºयांवर असलेल्या शेतकºयांच्या शेती पुरामुळे खरडल्या जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकºयांत धाकधूकही आहे.येलदरी, सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी या पावसाने वाढत आहे. पाणी वाढत असल्याचा आनंद आहे. धरण भरले तर पुढच्या सुगीसोबत वर्षभराची चिंता संपणार आहे. त्यामुळे धरणाची पाण पातळी वाढत असल्याचा आनंदही आहे. त्यामुळे आनंद व धाकधूक वाढवणारा हा पाऊस ठरत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस