शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

कर्जमाफीसाठी अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्याच्या भेटीला, कर्जतला अडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:36 IST

सरसकट कर्जमाफीसाठी हिंगोलीतील ४० शेतकरी निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

- दिलीप कावरखे गोरेगाव (जि. हिंगोली) : राज्यातील सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील जवळपास ४० शेतकरी मंगळवारी मुंबईकडे दुपारी चार वाजता रवाना झाले आहेत. परंतु बुधवारी सकाळी या सर्व शेतकऱ्यांना कर्जत (रायगड) पोलिसांनी पुढील आदेशापर्यंत थांबवून घेतले आहे. 

११ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नामदेव पतंगे व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. यानंतर दुपारी चार वाजता हे सर्व शेतकरी मुंबईकडे रवाना झाले. परंतु बुधवारी सकाळी या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना कर्जत (जि. रायगड) येथे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत आपण मुंबईला जाऊ नका, असे पोलिसांनी सांगितले. परंतु जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही. तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.१२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आम्हाला थांबून घेतले असले तरी आम्ही घाबरणार नाहीत. आमचे आंदोलन यापुढेही सुरूच राहील, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.  गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, संजय मुळे, गजानन जाधव, प्रवीण मते, दीपक सावके, चंद्रकांत सावके, शांतीराम सावके आदीसह हिंगोली जिल्ह्यातील ४० ते ५० शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

गोरेगावचे पोलिस मागावर...हिंगोली पासून मुंबईकडे निघालेले आंदोलक शेतकऱ्यांच्या मागावर गोरेगाव पोलीसही आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून सरकारकडे जाणे गुन्हा आहे का ? आमच्याकडे कुठले शस्त्र नाही, अंगावर पूर्ण कपडे नाहीत. लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असताना पोलिसांनी मागावर राहत ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचे प्रकार नेहमीच होत आहेत.  - नामदेव पतंगे, आंदोलक शेतकरी, गोरेगाव

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीagitationआंदोलन