शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Hingoli: शेतकऱ्यांना दिलासा द्या, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सरणावर उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:42 IST

हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे.

हिंगोली : अतिवृष्टीच्या माऱ्यात जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, या संकटातून दिलासा मिळावा यासाठी हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, या मागणीसाठी १५ ऑक्टोबरपासून शेतकरी नेते डाॅ.रमेश शिंदे यांनी तालुक्यातील केसापूर येथील स्मशानभूमीत स्वत: सरण रचून त्यावर उपोषण सुर केले आहे.

हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. खरडलेल्या जमिनी पेरणीलायक राहिल्या नाहीत. अनेक भागात पाणी साचल्याने पिके जागेवरच सडली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जाचा बोजाही वाढत आहे. त्यामुळे हिंगोलीसह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. परंतु, सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डाॅ. शिंदे यांनी केला आहे.

शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा असताना हेक्टरी केवळ ८ हजार ५०० रुपयांवर बोळवण करण्यात आली. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसून, जिल्ह्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच कयाधू नदीवरील खरबी वळण बंधारा रद्द करण्यात यावा,  अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी डाॅ.शिंदे यांनी केसापूर येथील स्मशानभूमीत सरण रचून त्यावर उपोषण सुरू केले आहे.

‘तो’ शासन निर्णय फसवा; उपोषणार्थीचा आरोप...शासनाच्या वतीने ९ ऑक्टोबर रोजी आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून हिंगोली आणि सेनगाव तालुक्याला वगळले होते. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी वगळण्यात आलेल्या दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याचे  यंत्रणेकडून सांगण्यात आले. आणि त्यासंदर्भातील शासन निर्णयही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. परंतु, त्या शासन निर्णयावर सहसचिवांची स्वाक्षरी नसल्याचा डाॅ. रमेश शिंदे यांनी आरोप केला होता. त्यानंतर पुन्हा तोच शासन निर्णय स्वाक्षरीसह सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. परंतु, हा शासन निर्णयही फसवा असल्याचा आरोप उपोषणार्थी डाॅ.रमेश शिंदे यांनी केला असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता स्मशानात सरण रचून उपोषण सुरू केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli Farmers Demand Drought Relief, Protest by Fasting on Funeral Pyre

Web Summary : Hingoli farmers, devastated by excessive rain, demand immediate drought relief. Leader Dr. Ramesh Shinde is fasting on a funeral pyre, protesting government inaction and inadequate compensation. He also alleges a deceptive government resolution regarding disaster relief funds and seeks the cancellation of the Kharbi diversion dam.
टॅग्स :HingoliहिंगोलीagitationआंदोलनfloodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र