शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात ८४ टक्के पेरण्या पूर्ण; सततच्या पावसाने काही भागात पेरणी नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:04 IST

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी पेरण्याच करता आल्या नाहीत. तर काहींच्या पेरण्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने ८४.३९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. 

हिंगोली : यंदा जिल्ह्यात मान्सून वेळेवर दाखल झाला. शिवाय सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी पेरण्याच करता आल्या नाहीत. तर काहींच्या पेरण्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने ८४.३९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. 

हिंगोली जिल्ह्यात यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. शिवाय मध्यंतरीचे दहा ते बारा दिवस वगळले तर पावसात सातत्य आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अतिवृष्टीचाही फटका बसला. यंदा आतापर्यंत ४९.३१ टक्के पर्जन्यमान झाले असून गतवर्षी अवघे ३0.५१ टक्के झाले होते. मागील चोवीस तासांत आज सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार हिंगोली-१0, वसमत-३.७१, कळमनुरी-१0.६७, औंढा -७.२५, सेनगाव ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या हंगामात आजपर्यंत तालुकानिहाय पर्जन्य  हिंगोली-४५८.३८, वसमत-४३२.११, कळमनुरी-४८२.५१, औंढा -४२४.७५, सेनगाव ४0३.३२ मिमी असे आहे.

हिंगोली जिल्ह्यात खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ४0 हजार ६२७ हेक्टर असून ५ हजार ५२७ हेक्टरवर पेरणी झाली. बाजरीची ४४ हेक्टर, खरीप मक्का ९४६ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीचे क्षेत्र वाढले असून ३८ हजार ६३६ हेक्टर, मूग ६९२५ हेक्टर, उडीद ५0१४ हेक्टर, इतर कडधान्य ७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तीळ १९५ हेक्टर, कारळ १२0 हेक्टर, सोयाबीन २ लाख २३ हजार ९४ हेक्टरवर पेरले गेले आहे. यात वाढ झाली. तर कापसाचे क्षेत्र ८२ हजारांवरून ४२ हजार ६११ हेक्टरवर आले आहे. इतर पिके ११0६ हेक्टरवर आहेत. जिल्ह्याच्या ३.८४ लाख एवढ्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३.२४ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. हे प्रमाण ८४.३९टक्के आहे. तालुकानिहाय विचार केला तर कळमनुरी व हिंगोली तालुक्यात १00 टक्क्यांवर पेरणी झाली. वसमत-७४, औंढा ७६ तर सेनगावात ७२ टक्के पेरणी झाली.

आठ तलाव भरलेजिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असली तरीही केवळ ८ तलावच १00 टक्के भरले आहेत. तर ७ २५ टक्क्यांच्या आत आहेत. १ पन्नास टक्क्यांपर्यंत भरला. दोन तलाव ७५ टक्क्यांपर्यंत भरले. तर ४ त्यापेक्षा जास्त भरले आहेत.  या सर्व प्रकल्पांत २७ दलघमी पाणी असून ५१.८३ टक्के जलसाठा झाला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस