शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; सरकारने भरपाई देण्याची रोहित पवारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:05 IST

यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असून असून त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत

हिंगोली: सेनगाव  तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी. याकडे सरकारने काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे, अशी मागणी आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून केली. यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असून असून त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आ. रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा सुरू केली.  यात्रा सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सेनगाव तालुक्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी सेनगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सेनगाव तालुक्यातील समस्या मांडून सरकारला धारेवर धरले. बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. मराठा समाजाच्या भावना दुखावणारे भाषण केल्यामुळे समाजात दुही निर्माण होत आहे. त्यामुळे अशी वक्तव्य करणे सत्ताधाऱ्यांनी टाळले पाहिजे, असे आवाहनही आ. पवार यांनी केले. 

पुढे ते म्हणाले, मराठवाड्यात युवा संघर्ष यात्रा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी बहुतांश समस्या आढळून आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. त्यासाठी सेनगाव तालुक्याच्या एमआयडीसी उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यावर सरकारने वेळीच लक्ष दिले पाहिजे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, अशी म आगणी आमदार पवार यांनी केली. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी