शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे; रास्तारोको आंदोलनात कॉंग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 16:38 IST

हिगोली-जिंतूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प

सेनगाव : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रसने बुधवारी (दि. ६) हिगोली -जिंतूर रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे असा आरोप केला.

तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी  हतबल झाला आहे. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी रस्तारोको करण्यात आला. हिगोली -जिंतूर या  मुख्य मार्गावरील टि पाँईडवर  रस्तारोकोमुळे जवळपास तासभर वाहतुक ठप्प झाली होती. वाहनांच्या रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या.

शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे...अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन,कापूस,झेंडू या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांने जगावे कसे असा सवाल  काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी या वेळी बोलताना केला. हे सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे असा गंभीर आरोप ही त्यांनी यावेळी केला. 

आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय देशमुख, माजी जि.प.सदस्य द्वारकदास सारडा, युवक लोकसभा उपाध्यक्ष जितु देशमुख, पंचायत समिती सभापती स्वाती देशमुख, रणजित पाटील गोरेगावकर, वामन राठोड, नारायण डुबे,गजानन क्षीरसागर,अनिल पाटील,शालीक देशमुख,भगवान काळबांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनcongressकाँग्रेसHingoliहिंगोली