शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST

हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे वधू पित्यांसह वर पित्यांची धांदल उडत आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून ...

हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे वधू पित्यांसह वर पित्यांची धांदल उडत आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी कोरोना महामारी ही अजून संपलेली नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे.

करोना महामारीची तिसरी लाट समोर ठेवूनच मंगल कार्यालयांनाही काही अटी घातल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना नियमाचे पालन केले नाही तर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असल्यामुळे बाजारपेठेतही गर्दी दिसून येत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये विवाह मुहूर्त २१ आहेत. त्यामुळे दागिने करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी होऊ लागली आहे.

...या असतील अटी

विवाह कार्य करण्यासाठी अनेक जण मंगल कार्यालय राखीव करतात. परंतु मंगल कार्यालयांना जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे. मंगल कार्यालयात मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक आहे. याचबरोबर वर-वधू पित्यांना वऱ्हाडी मंडळींसाठी मास्क खरेदी करावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे ५० वऱ्हाडी मंडळींनाच मंगल कार्यालयात परवानगी असणार आहे.

परवानगीसाठी अग्निदिव्य

विवाह कार्य करून घ्यायचे असेल तर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे महत्त्वाचे आहे. ५० वऱ्हाडींनाच विवाहास येण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच मंगल कार्यालयात सामाजिक अंतर ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वऱ्हाडी मंडळींना मास्क बंधनकारक असणार आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नाही केले तर कार्यवाहीला सामोरेही जावे लागणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

असे आहेत विवाह मुहूर्त

जुलै महिन्यात ३, १३, १८, २२, २५, २६, २८, २९, ऑगस्ट महिन्यामध्ये ११, १४, १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ तर सप्टेंबर महिन्यामध्ये ८, १६, १७ असे विवाह आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २१ विवाह तिथी आहेत. विवाह होत आहेत. पण ५० वऱ्हाडी मंडळीमध्येच. जास्त वऱ्हाडी मंडळींना परवानगी नाही. त्यातही कोरोनाचे नियम सर्वांना बंधनकारक आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे कोरोनाचे नियम पुरोहितांनाही बंधनकारक आहेत. विवाह लावतेवेळेस पुरोहितांनी मास्क घालणे आवश्यक आहे, असे रेणुकादासगुरू कुलकर्णी यांनी सांगितले.

वधू-वर पित्यांची कसरत

विवाह मुहूर्ताच्या तारखा जास्त आहेत. परंतु, वऱ्हाडी मंडळींना जास्त प्रमाणात बोलवता येणार नाही. त्यामुळे मानपानापासून दूरच रहावे लागणार आहे. बाजारपेठेसाठी काही ठरावीक वेळ दिली आहे. त्यात वेळेतच कापड व अन्नधान्य खरेदी करावे लागणार आहे. एकंदर वधू-वर पित्यांना कसरत करावी लागणार आहे.

कोरोनाआधी थाटामाटात विवाह कार्य पार पडले. परंतु गत दीड वर्षापासून विवाह कार्य कमी वऱ्हाडींमध्ये होत आहेत. परिणामी रुसवे-फुगवे बंदच झाले आहेत. वऱ्हाडींना मंडपात विनामास्क फिरता येणार नाही. वऱ्हाडी मंडळी जास्त जमली की वर-वधू पित्यांना कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. मुला-मुलींचा विवाह करायचा झाल्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. विवाहासाठी परवानगी मिळविण्यासाठी वधू-वर पित्यांची धावपळ सुरू आहे.