शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST

हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे वधू पित्यांसह वर पित्यांची धांदल उडत आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून ...

हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे वधू पित्यांसह वर पित्यांची धांदल उडत आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी कोरोना महामारी ही अजून संपलेली नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे.

करोना महामारीची तिसरी लाट समोर ठेवूनच मंगल कार्यालयांनाही काही अटी घातल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना नियमाचे पालन केले नाही तर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असल्यामुळे बाजारपेठेतही गर्दी दिसून येत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये विवाह मुहूर्त २१ आहेत. त्यामुळे दागिने करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी होऊ लागली आहे.

...या असतील अटी

विवाह कार्य करण्यासाठी अनेक जण मंगल कार्यालय राखीव करतात. परंतु मंगल कार्यालयांना जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे. मंगल कार्यालयात मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक आहे. याचबरोबर वर-वधू पित्यांना वऱ्हाडी मंडळींसाठी मास्क खरेदी करावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे ५० वऱ्हाडी मंडळींनाच मंगल कार्यालयात परवानगी असणार आहे.

परवानगीसाठी अग्निदिव्य

विवाह कार्य करून घ्यायचे असेल तर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे महत्त्वाचे आहे. ५० वऱ्हाडींनाच विवाहास येण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच मंगल कार्यालयात सामाजिक अंतर ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वऱ्हाडी मंडळींना मास्क बंधनकारक असणार आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नाही केले तर कार्यवाहीला सामोरेही जावे लागणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

असे आहेत विवाह मुहूर्त

जुलै महिन्यात ३, १३, १८, २२, २५, २६, २८, २९, ऑगस्ट महिन्यामध्ये ११, १४, १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ तर सप्टेंबर महिन्यामध्ये ८, १६, १७ असे विवाह आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २१ विवाह तिथी आहेत. विवाह होत आहेत. पण ५० वऱ्हाडी मंडळीमध्येच. जास्त वऱ्हाडी मंडळींना परवानगी नाही. त्यातही कोरोनाचे नियम सर्वांना बंधनकारक आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे कोरोनाचे नियम पुरोहितांनाही बंधनकारक आहेत. विवाह लावतेवेळेस पुरोहितांनी मास्क घालणे आवश्यक आहे, असे रेणुकादासगुरू कुलकर्णी यांनी सांगितले.

वधू-वर पित्यांची कसरत

विवाह मुहूर्ताच्या तारखा जास्त आहेत. परंतु, वऱ्हाडी मंडळींना जास्त प्रमाणात बोलवता येणार नाही. त्यामुळे मानपानापासून दूरच रहावे लागणार आहे. बाजारपेठेसाठी काही ठरावीक वेळ दिली आहे. त्यात वेळेतच कापड व अन्नधान्य खरेदी करावे लागणार आहे. एकंदर वधू-वर पित्यांना कसरत करावी लागणार आहे.

कोरोनाआधी थाटामाटात विवाह कार्य पार पडले. परंतु गत दीड वर्षापासून विवाह कार्य कमी वऱ्हाडींमध्ये होत आहेत. परिणामी रुसवे-फुगवे बंदच झाले आहेत. वऱ्हाडींना मंडपात विनामास्क फिरता येणार नाही. वऱ्हाडी मंडळी जास्त जमली की वर-वधू पित्यांना कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. मुला-मुलींचा विवाह करायचा झाल्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. विवाहासाठी परवानगी मिळविण्यासाठी वधू-वर पित्यांची धावपळ सुरू आहे.