शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST

हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे वधू पित्यांसह वर पित्यांची धांदल उडत आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून ...

हिंगोली: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे वधू पित्यांसह वर पित्यांची धांदल उडत आहे. कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी कोरोना महामारी ही अजून संपलेली नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे.

करोना महामारीची तिसरी लाट समोर ठेवूनच मंगल कार्यालयांनाही काही अटी घातल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना नियमाचे पालन केले नाही तर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असल्यामुळे बाजारपेठेतही गर्दी दिसून येत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये विवाह मुहूर्त २१ आहेत. त्यामुळे दागिने करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी होऊ लागली आहे.

...या असतील अटी

विवाह कार्य करण्यासाठी अनेक जण मंगल कार्यालय राखीव करतात. परंतु मंगल कार्यालयांना जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे. मंगल कार्यालयात मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक आहे. याचबरोबर वर-वधू पित्यांना वऱ्हाडी मंडळींसाठी मास्क खरेदी करावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे ५० वऱ्हाडी मंडळींनाच मंगल कार्यालयात परवानगी असणार आहे.

परवानगीसाठी अग्निदिव्य

विवाह कार्य करून घ्यायचे असेल तर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे महत्त्वाचे आहे. ५० वऱ्हाडींनाच विवाहास येण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच मंगल कार्यालयात सामाजिक अंतर ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वऱ्हाडी मंडळींना मास्क बंधनकारक असणार आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नाही केले तर कार्यवाहीला सामोरेही जावे लागणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

असे आहेत विवाह मुहूर्त

जुलै महिन्यात ३, १३, १८, २२, २५, २६, २८, २९, ऑगस्ट महिन्यामध्ये ११, १४, १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ तर सप्टेंबर महिन्यामध्ये ८, १६, १७ असे विवाह आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २१ विवाह तिथी आहेत. विवाह होत आहेत. पण ५० वऱ्हाडी मंडळीमध्येच. जास्त वऱ्हाडी मंडळींना परवानगी नाही. त्यातही कोरोनाचे नियम सर्वांना बंधनकारक आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे कोरोनाचे नियम पुरोहितांनाही बंधनकारक आहेत. विवाह लावतेवेळेस पुरोहितांनी मास्क घालणे आवश्यक आहे, असे रेणुकादासगुरू कुलकर्णी यांनी सांगितले.

वधू-वर पित्यांची कसरत

विवाह मुहूर्ताच्या तारखा जास्त आहेत. परंतु, वऱ्हाडी मंडळींना जास्त प्रमाणात बोलवता येणार नाही. त्यामुळे मानपानापासून दूरच रहावे लागणार आहे. बाजारपेठेसाठी काही ठरावीक वेळ दिली आहे. त्यात वेळेतच कापड व अन्नधान्य खरेदी करावे लागणार आहे. एकंदर वधू-वर पित्यांना कसरत करावी लागणार आहे.

कोरोनाआधी थाटामाटात विवाह कार्य पार पडले. परंतु गत दीड वर्षापासून विवाह कार्य कमी वऱ्हाडींमध्ये होत आहेत. परिणामी रुसवे-फुगवे बंदच झाले आहेत. वऱ्हाडींना मंडपात विनामास्क फिरता येणार नाही. वऱ्हाडी मंडळी जास्त जमली की वर-वधू पित्यांना कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. मुला-मुलींचा विवाह करायचा झाल्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. विवाहासाठी परवानगी मिळविण्यासाठी वधू-वर पित्यांची धावपळ सुरू आहे.