शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
7
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
8
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
9
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
10
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
11
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
12
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
13
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
14
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
15
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
16
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
17
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
18
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
19
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
20
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...

घिसडी समाजाचे ऐरणीच्या देवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

हिंगोली : वर्षाचे ३६५ दिवस १० किलोचा घन उचलून लोखंडाचे पाणी करावे तेव्हाच लेकरांबाळांच्या पोटापुरते अन्न मिळते. पण कोरोनामुळे ...

हिंगोली : वर्षाचे ३६५ दिवस १० किलोचा घन उचलून लोखंडाचे पाणी करावे तेव्हाच लेकरांबाळांच्या पोटापुरते अन्न मिळते. पण कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे तेही पदरात पडत नाही. ‘कोरोना महामारी लवकर जाऊ दे अन्‌ लेकराबाळांना भाकरकुटका मिळू दे’ असे म्हणत घिसडी समाजाने ऐरणीच्या देवाला साकडे घातले आहे.

वर्षाचे ३६५ दिवस लोखंडाचे पाणी करावे लागते. तरच घरात कोरकुटका खायला मिळतो अन्‌ कुटुंबाचा गाडा चालतो. गोडधोड तर आमच्या नशिबातच नाही. कोरोनाआधी दिवसाकाठी कसेतरी १०० रुपये मिळायचे. तेही कोरोनाने हिसकावून घेतले आहेत. आजमितीस ५० ते ६० रुपये दिवसाकाठी मिळत आहेत. पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसायही करता येत नाही. ऐरणीच्या देवाने ७० वर्षांमध्ये आजपर्यंत कधी उपाशी ठेवले नाही. मग आताच का असा अंत पाहतो आहे, असा प्रश्नही या समाजाने ऐरणीच्या देवाला विचारला आहे.

१० किलोचा घन उचलून लोखंडावर मारून त्याला आकार देणे हे मोठे काम आहे. जोखीम पत्करून हे काम करावे लागते. थोडी नजर चुकली की सहकऱ्याला दुखापत होण्याची शक्यता असते. मागच्यावर्षी शासनाने थोडीबहुत मदत केली होती. परंतु, यावर्षी शासनाने काहीही मदत केली नाही, असेही या समाजाने सांगितले.

घिसडी समाजाची नाही म्हटली तरी जिल्ह्यात दहा ते बारा कुटुंबे हाच व्यवसाय करतात. हिंगोली शहरात सहा ते सात कुटुंबेही लोखंडाचे पाणी करून उपजीविका भागवितात. बाहेर पडावे तर जाता येत नाही, घरात बसावे तर अन्न मिळत नाही, अशा दुहेरी संकटात समाज सापडला आहे. लोखंड गरम करण्यासाठी कोळसा लागतो. परंतु, महागाईने कळस गाठल्याने तोही वेळेवर मिळत नाही. कधी-कधी अगठी बंद ठेवावी लागते. कोळसा नाही मिळाला तर काडीकचरा आणून अगठी पेटविली जाते. आता शासनाने एक दिवसाआड कामाला परवानगी दिली असली तरी अकरा वाजेपर्यंतच काम उरकून घ्यावे असेही सांगितले आहे. मोठी माणसे उपाशी राहू शकतात. लेकरे उपाशी राहू शकत नाहीत. तेव्हा शासनाने घिसडी समाजाचा विचार करून अन्नधान्य पदरात टाकावे, अशी विनंतीही केली आहे.

उन्हाळ्याचे दिवसही हातचे जात आहेत....

फेब्रुवारी महिन्यापासून शेतीची कामे सुरू होतात. जिल्ह्यातील शेतकरी खुरपे, नांगर, लोखंडी शिवळा, लोखंडी जू, कुणी, विळा आदी शेती विषयक औजारे घेऊन येतात. यातून पोटापुरता पैसा पदरात पडतो. परंतु, कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्यामुळे शेतकरीवर्गही येत नाही. त्यामुळे हाही हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती वाटत आहे. शासनाने घिसडी समाजाचा विचार करून एकवेळचे अन्नतरी द्यावे, अशी मागणी रंगनाथ सोळंके, संतोष सोळंके, राम शिंदे यांनी केली आहे.

फोटो १०