शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

घिसडी समाजाचे ऐरणीच्या देवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

हिंगोली : वर्षाचे ३६५ दिवस १० किलोचा घन उचलून लोखंडाचे पाणी करावे तेव्हाच लेकरांबाळांच्या पोटापुरते अन्न मिळते. पण कोरोनामुळे ...

हिंगोली : वर्षाचे ३६५ दिवस १० किलोचा घन उचलून लोखंडाचे पाणी करावे तेव्हाच लेकरांबाळांच्या पोटापुरते अन्न मिळते. पण कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे तेही पदरात पडत नाही. ‘कोरोना महामारी लवकर जाऊ दे अन्‌ लेकराबाळांना भाकरकुटका मिळू दे’ असे म्हणत घिसडी समाजाने ऐरणीच्या देवाला साकडे घातले आहे.

वर्षाचे ३६५ दिवस लोखंडाचे पाणी करावे लागते. तरच घरात कोरकुटका खायला मिळतो अन्‌ कुटुंबाचा गाडा चालतो. गोडधोड तर आमच्या नशिबातच नाही. कोरोनाआधी दिवसाकाठी कसेतरी १०० रुपये मिळायचे. तेही कोरोनाने हिसकावून घेतले आहेत. आजमितीस ५० ते ६० रुपये दिवसाकाठी मिळत आहेत. पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसायही करता येत नाही. ऐरणीच्या देवाने ७० वर्षांमध्ये आजपर्यंत कधी उपाशी ठेवले नाही. मग आताच का असा अंत पाहतो आहे, असा प्रश्नही या समाजाने ऐरणीच्या देवाला विचारला आहे.

१० किलोचा घन उचलून लोखंडावर मारून त्याला आकार देणे हे मोठे काम आहे. जोखीम पत्करून हे काम करावे लागते. थोडी नजर चुकली की सहकऱ्याला दुखापत होण्याची शक्यता असते. मागच्यावर्षी शासनाने थोडीबहुत मदत केली होती. परंतु, यावर्षी शासनाने काहीही मदत केली नाही, असेही या समाजाने सांगितले.

घिसडी समाजाची नाही म्हटली तरी जिल्ह्यात दहा ते बारा कुटुंबे हाच व्यवसाय करतात. हिंगोली शहरात सहा ते सात कुटुंबेही लोखंडाचे पाणी करून उपजीविका भागवितात. बाहेर पडावे तर जाता येत नाही, घरात बसावे तर अन्न मिळत नाही, अशा दुहेरी संकटात समाज सापडला आहे. लोखंड गरम करण्यासाठी कोळसा लागतो. परंतु, महागाईने कळस गाठल्याने तोही वेळेवर मिळत नाही. कधी-कधी अगठी बंद ठेवावी लागते. कोळसा नाही मिळाला तर काडीकचरा आणून अगठी पेटविली जाते. आता शासनाने एक दिवसाआड कामाला परवानगी दिली असली तरी अकरा वाजेपर्यंतच काम उरकून घ्यावे असेही सांगितले आहे. मोठी माणसे उपाशी राहू शकतात. लेकरे उपाशी राहू शकत नाहीत. तेव्हा शासनाने घिसडी समाजाचा विचार करून अन्नधान्य पदरात टाकावे, अशी विनंतीही केली आहे.

उन्हाळ्याचे दिवसही हातचे जात आहेत....

फेब्रुवारी महिन्यापासून शेतीची कामे सुरू होतात. जिल्ह्यातील शेतकरी खुरपे, नांगर, लोखंडी शिवळा, लोखंडी जू, कुणी, विळा आदी शेती विषयक औजारे घेऊन येतात. यातून पोटापुरता पैसा पदरात पडतो. परंतु, कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्यामुळे शेतकरीवर्गही येत नाही. त्यामुळे हाही हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती वाटत आहे. शासनाने घिसडी समाजाचा विचार करून एकवेळचे अन्नतरी द्यावे, अशी मागणी रंगनाथ सोळंके, संतोष सोळंके, राम शिंदे यांनी केली आहे.

फोटो १०