नांदेड जिल्ह्यात समावेशासाठी प्रजासत्ताकदिनी ८ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:50+5:302021-02-05T07:54:50+5:30
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील काही गावे ही नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर व जवळपास वसलेली आहेत. कळमनुरी तालुका व हिंगोली जिल्ह्याचे ...

नांदेड जिल्ह्यात समावेशासाठी प्रजासत्ताकदिनी ८ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील काही गावे ही नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर व जवळपास वसलेली आहेत. कळमनुरी तालुका व हिंगोली जिल्ह्याचे ठिकाण अंतराने अधिक असल्याने डोंगरकडासह परिसरातील ८ गावांतील नागरिकांना कामे करताना फार मोठ्या अडचणींनीना सामोरे जावे लागत असल्याने नांदेड जिल्ह्याच्या सिमेवर व जवळपास वसलेली गावे नांदेड जिल्ह्यात समाविष्ट करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी डोंगरकडा कृती समितीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमाेर उपाेषण करण्यात आले.
यामध्ये डोंगरकडा, जवळा पांचाळ, वडगाव, हिवरा, वरुड, भाटेगाव, सुकळीविर, झुनझुनवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात आले. डोंगरकडा परिसरातील आठ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. अर्धापूर तालुक्यात या गावांना अवघ्या १२ किमी अंतरावर आहे. तर नांदेड २५ किमी अंतरावर आहे. या भागातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, विध्यार्थ्यांचे शिक्षण, यासह अनेक कामकाज नांदेड येथे करण्यात सोयीस्कर आहेत. याउलट कळमनुरी तालुक्याचे अंतर ४० किमी आहे, तर हिंगोली जिल्ह्याचे अंतर ६० किमी आहे. त्यामुळे डोंगरकडा, जवळा पांचाळ, वडगाव, हिवरा, वरुड, भाटेगाव, सुकळीविर, झूनझुनवाडी या गावांना दूर हाेत आहे. यामुळे या गावांचा आर्धापूर तालुक्यात समावेश करावा, या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे.
याबाबतचा ग्रामपंचायतचा ठराव सर्व ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला आहे. तलाठी राजेश क्षिरसागर, दांडिमे यांच्याकडे ठराव देण्यात आला आहे. यावेळी अशोक अडकीने, आनंद अडकीने, संजय बहात्तरे, भगवान पवार, गोविंद राठोड, भालुसिंग राठोड, पप्पू वीर, डॉ. शेख ईसा, साहेबराव सितळे, पाशा पटेल, गोविंद पारडकर, शिवलाल राठोड, यांच्यासह वरील गावांतील गावकऱ्यांनी उपोषणात सहभाग घेतला होता. यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून डोंगरकडा चौकीचे जमादार भगवान वडकिले, शेख बाबर, बापूराव बाभळे, प्रभाकर भोंग, यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फोटो नं.६