पेन्शनर्सचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:51 IST2019-01-23T23:51:36+5:302019-01-23T23:51:38+5:30
विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पेन्शनर्सचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, डिसेंबर २0१८ मध्ये दिल्ली येथे भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर उपोषण केले. तेव्हा केंद्रीय रोजगारमंत्री संतोषकुमार गंगवाल यांनी ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यातील कोणत्याच मागण्या मान्य झाल्या नसल्याने आम्हाला पुन्हा त्यासाठी लढा द्यावा लागत आहे. पेन्शनसाठी अंशदान मर्यादा अतिशय कमी असल्यामुळे त्यावेळी कपातही कमी व्हायची अन् आता पेन्शनही २00 रुपये ते २५00 रुपयांपर्यंतच मिळत आहे. देशात ६0 लाख कर्मचाऱ्यांना एवढ्या कमी पेन्शनवर वृद्धपकाळात पत्नीसह चांगले जीवन व्यतित करणेही शक्य नाही. त्यामुळे यात वाढ करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाप्रमाणे पेन्शन देण्यात यावी, ७५00 रुपये किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता द्यावा, ईपीएस पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा द्यावी, ज्यांना ईपीएस ९५ या योजनेत घेतले नाही, त्या सर्वांनाही यात घेवून किमान पाच हजार रुपये पेन्शन द्यावी आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर रत्नाकर उंडेगावकर, एस.आर. पतंगे, अे.जी डाखोरे आदींच्या सह्या आहेत.