शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

तुटपुंजे मानधनही मिळेना वेळेवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:57 PM

मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष.जिल्ह्यातील हजारो स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन अद्याप रखडलेलेच आहे. जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाºया मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने सध्या उसणवारीवरच व्यवहार सुरू आहेत. तेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न कायम आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. योजना प्रभावीपणे राबविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, शिवाय या योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबविली जात नाही. कधी शाळेत तांदुळाचा पुरवठा वेळेत होत नाही, तर कधी धान्यादी मालच नसतो. या विविध कारणांमुळे मात्र शाळकरी मुलांना पोषण आहार मिळत नाही. त्यात स्वयंपाकी मदतनिसांनाच्या मानधनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मानधन देण्याची मागणी मागील अनेक महिन्यांपासून आहे. परंतु याबाबत संबधित यंत्रणा लक्ष देण्यास तयार नसल्याचे मतदनिसांतून सांगितले जात आहे. मध्यान्ह भोजन म्हणून दिल्या जाणाºया पोषण आहार योजनेतून नेमके कोणाचे पोषण होत आहे असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.पुणे येथील शालेय पोषण आहारच्या स्वतंत्र विभागास म. रा. प्रा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी २०१६-१७ ते २०१७-१८ या वर्षातील मदतनिसांच्या मानधनाबाबत लेखी तक्रार केली होती. याबाबत संबधित विभागाने चौकशी करण्याचे पत्रही शिक्षण विभागास पाठविले आहे.जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळांमधून दीड लाखाच्या वर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. सकस आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची शासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरी संबधित यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शाळकरी मुलांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ येते. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मदनिसांचे मानधन नियमित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु मानधनाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते.शिक्षण विभागातील संबधित यंत्रणाही मतदनिसांच्या मानधनाबाबत काही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेमके मानधन न अदा करण्याचे कारण समजण्यास मार्ग नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा