शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 14:24 IST

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कळमनुरी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनचे ढिगारे भिजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी ढिगारे कापडाने झाकून ठेवली होती, परंतु जमिनीला ओल येऊन पिकाचे नुकसान होत असल्याने  शेतकरी  चिंताक्रांत झाले आहेत.

कळमनुरी तालुक्‍यात ५२ हजार ६९५ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होतो. सोयाबीनमध्ये पाणी शिरत असल्याने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. तालुक्यात ७४ हजार १७३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये कापूस लागवड ८ हजार १४० हेक्टरवर झाली आहे. सध्या कापूस फुटलेला असून यामध्ये पाणी झाले आहे, कापसाची बोंडे ओली चिंब झाली आहेत. तसेच ज्वारीचा पेरा १ हजार २७५ हेक्‍टरवर असून सततच्या पावसामुळे ज्वारी काळी पडली आहे.

परिसरातील कयाधू नदी भरून वाहत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्वे करण्याच्या सूचना तहसिलदारांनी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांना दिल्या आहेत. सध्या नुकसानीचा सर्वे सुरू आहे. सोयाबीन कापणीच्या वेळी पाऊस पडत असल्यामुळेशेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी अगोदरच सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार व तिबार पेरणी करावी लागली होती. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा पावसाने संकटांचे ढग अधिकच गडद केले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद