शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

शेवटपर्यंत शेतकऱ्यांना मिळेना कालव्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:08 IST

कुरूंदा भागातील शेवटच्या टोकापर्यंत भाटेगाव कालव्याचे पाणी मिळत नसल्याने पिंपराळा, मंहमदपुरवाडी, माहगाव भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : कुरूंदा भागातील शेवटच्या टोकापर्यंत भाटेगाव कालव्याचे पाणी मिळत नसल्याने पिंपराळा, मंहमदपुरवाडी, माहगाव भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकºयांच्या जमिनी गेल्या पण कालव्याद्वारे अजिबात पाणी मिळत नसल्याने इसापूर धरणाच्या पाण्यापासून शेतकºयांना वंचित रहावे लागत आहे. पाण्याचे नियोजन पैनगंगा प्रकल्पाच्या सिंचन विभागाला लागलेला नसल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचताना दिसत नाही.कुरूंदा भागामध्ये इसापूर धरणाचे पाणी भाटेगाव कालव्याद्वारे येते. कुरूंदा गावाच्या पुढे पाणी पोहचण्यास अडथळे निर्माण झाल्याने किंवा नियोजनअभावी पिंपराळा, माहगाव, मंहमदपुरवाडी या गावांना पाणी मिळत नाही. अनेक वर्ष झाले या तिन्ही गावातील जमिनी कालव्यासाठी गेल्या. परंतु या भागातील शेतकºयांना पाणी मिळालेच नाही. पिंपराळा, महंमदपूरवाडी, माहगाव भागातील शेतकरी कालव्याची पाणीपट्टी उपलब्ध करून देखील त्यांना पाणी देण्यास दिरंगाई होत आहे. सिंचन विभागाचा नियोजन लागलेला नाही. चोख नियोजनाची आवश्यकता आहे. या भागाकरिता जवळपास पाच ते सात दिवस पाणी कालव्यात उपलब्ध असतो. नियोजनचा अभाव असल्याने सात दिवसांमध्येही शेवटच्या भागापर्यंत पाणी मिळत नाही. मोठी कसरत करून देखील पाणी मिळत नसल्याने शेतकºयांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. पिंपराळा, माहगाव, मंहमदपुरवाडी भागातील शेतकºयांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पिंपराळा भागातील शेतकºयांना कालवा असताना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने पिंपराळा माहगाव भागातील हळदीचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले. तर रब्बी पेरणी देखील कोलमडली आहे. आतापासून पाणी पातळी खालावल्याने धरणाच्या पाण्यावरच बागायती पिकासह हळद उत्पादन अवलंबून होते. त्यात शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळण्यास झालेली दिरंगाई या भागातील शेतकºयांसाठी अडचणीची ठरली आहे.सिंचनाच्या बाबतीत हिंगोली जिल्हा पिछाडीवरच आहे. इसापूर धरणाचे पाणी भाटेगाव कालव्याच्य पट्ट्यापर्यंत कळमनुरीचा मोजका तर वसमत तालुक्यातील कुरूंदा भागापर्यंत फायदा होता. पाण्याची पहिली पाळी नांदेड जिल्ह्याला अगोदर जाते. त्यानंतर या भागातील पाणी मिळते. त्यात शेवटच्या टोकला पाणी उपलब्धही होत नाही. कुरूंदा भागात पाणी येऊनही दाभडीच्या नाल्याद्वारे पुर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून मालेगाव भागात पाणी जाते. पाणी कोणीकडेही त्याचा अधिकचा फायदा नांदेड जिल्ह्यालाच होतो. आरक्षीत पाण्याचा अधिकार फारसा वापरल्या जात नाही. त्यात राजकीय वजन असणारे नांदेडचे वजन अधिकपडते. एका प्रकारे जिल्ह्याचा विचार केल्यास केवळ नावालाच पाणी दिल्या जाते. शेवटच्या टोकापर्यंत पाणी देण्याचे नियोजन अद्याप आखल्या न गेल्याने धरणाचे पाणी पिंपराळा परिसरात मिळताना दिसत नाही. पिंपराळा भागापर्यंत पाणी देण्याचे नियोजन होते. तसे आम्हीपर्यंत देखील केले. परंतु कालव्यामध्ये जागोजागी पाणी उपसासाठी पाईप टाकले आहेत. त्यामुळे प्रयत्न करुनही पाणी शेवटच्या भागापर्यंत गेले नाही. पाईप टाकणाºया या शेतकºयांना नोटीसा दिल्या असून कार्यवाही केल्या जाईल, असे सिंचन शाखाअभियंता पत्की यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प