शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

'येथील' ग्रामस्थ सहन करतात वर्षातील ७ महिने दुष्काळझळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 20:08 IST

कळमनुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले भुरक्याची वाडी हे गाव साडेबाराशे लोकसंख्या असलेले हे शंभर टक्के आदिवासी गाव, गावात सिमेंट रस्ते, नाली, शाळा, मंदिर अशी आवश्यक सुविधा उभारल्या पण पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मात्र येथे कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.

ठळक मुद्दे१२ महिन्यातले सात महिने या गावावर पाण्याचं संकट येत असते.अर्धे वर्ष या गावातल्या ग्रामस्थांना दुष्काळझळा सहन कराव्या लागतात.

आखाडा बाळापूर (हिंगोली ) : ‘नेमिचे येतो दुष्काळ’ ही म्हण तयार झालीय भुरक्याची वाडी या गावासाठी. १२ महिन्यातले सात महिने या गावावर पाण्याचं संकट येत असते. अर्धे वर्ष या गावातल्या ग्रामस्थांना दुष्काळझळा सहन कराव्या लागतात. गेल्या सात वर्षांपासून पाण्याच्या भीषण दुष्काळाचे दुष्टचक्र गावाला ग्रासून टाकते. दुष्काळ अंगवळणी पडावा, असे भीषण चित्र येथे आहे. एक विहीर, एक बोअर अधिग्रहीत करून पाण्याची तहाण भागविली जातेय. पण हा उपायही तोकडाच पडतोय. कारण बोअर लावला की, अधिग्रहीत विहिरीतील पाणी संपतं. भयाण चिंताग्रस्त वातावरणात ग्रामस्थ दुष्काळाशी सामना करत आहेत.  

कळमनुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले भुरक्याची वाडी हे गाव साडेबाराशे लोकसंख्या असलेले हे शंभर टक्के आदिवासी गाव, गावात सिमेंट रस्ते, नाली, शाळा, मंदिर अशी आवश्यक सुविधा उभारल्या पण पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मात्र येथे कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. चारी बाजूंनी डोंगराळ भाग आहे. पण  पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाणीपातळी खोल गेल्यामुळे विहिरी, बोअर आटले. ग्रा.पं.तर्फे केलेले बोअर डिसेंबर महिन्यातच आटतात. जेमतेम चार ते पाच महिने गावाला पाणी मुबलक प्रमाणात मिळते. डिसेंबरपासून ते जूनपर्यंत समस्त ग्रामस्थांना दुष्काळझळा सोसाव्या लागतात.

गेल्या सात वर्षापासून पाण्याचा दुष्काळ ग्रामस्थांना छळतोय. तब्बल अर्धे वर्षे पाण्याचा दुष्काळ सोसावा लागत असल्याने ग्रामस्थांना आता दुष्काळही अंगवळणी पडतो आहे. सध्या गावातील संजाबराव कोकरे व संतोष भुरडे यांचा  एक  विहीर  व एक बोअर अधिग्रहित केले. यावर गावाची तहाण भागविण्याचा प्रयत्न केला जातो. मोटार लावली की पाणी संपते. त्यामुळे कधी पुन्हा पाणी जाईल याबाबतचा धसका ग्रामस्थांना आहे. तात्पुरती उपाययोजना करुन दिवस पुढे ढकलले जात आहेत. परंतु यावर कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नाही. प्रशासन कायम दुर्लक्ष करत असल्याने निश्चिय करून पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. जिवाच्या आकांताने लहाणापासून ते वृद्धांपर्यंत महिला पुरूष श्रमदानात सहभागी झाले.

पाण्याची पातळी वाढण्यासाठी कष्ट उपसत आहेत. गावच्या ललाटावरील दुष्काळ पुसून टाकण्यासाठी गाव झटत आहे. हे चित्र समाधानकारक असले तरी प्रशासन या आदिवासी बांधवांच्या चिंता मिटविण्यासाठी कधी पुढे येणार हा खरा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. अजूनही येथील अनेक कुटूंब या पाण्याला कंटाळून पर जिल्ह्यात स्थलांतरीत झाले आहेत. तर अजून जाण्याच्या मार्गावर आहेत. गावात दर वर्षी राहते ती केवळ वयोवृद्ध मंडळीच. त्यांनाही अशा दुष्काळातच दिवस ढकलावे लागत आहेत. सर्व कामे सोडून ग्रामस्थांना पाण्याच्या प्रतिक्षेत बसावे लागत आहे. पहाटे दोन कधी तीन वाजता उठून डोळे चोळत रांगेत नंबर लावण्याची वेळ वर्षानुवर्ष कमी झालेली नाही, हे विशेष!

ग्रामस्थांचा दुष्काळाशी सामना या गावाला नेहमीच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ कायम आहे. जे वर्ष निघेत ते सारखेच निघत आहे. ना कोणता प्रतिनिधी या गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. तर ना कधी कोणाता शासकीय अधिकारी गावात येऊन पाण्याचे नियोजन करण्यास सांगत नाही. त्यामुळे आपल दरवर्षी त्याच त्या भांड्याच्या रांगा लावून तासंतास ताटकाळत पाणी भरावे लागते. कधी - कधी तर पाणी भरता - भरता बोअरचे पाणी जात असल्याचाही अनुभव ग्रामस्थांना येत आहे. रांगेत थांबूनही पाणी मिळेच याची शाश्वती नाही. 

पाण्यासाठी ग्रामस्थ हतबलगेल्या सात वर्षापासून डिसेंबर नंतर पाण्याचा भीषण टंचाईला तोंड द्यावे लागते. पाण्याची उपलब्धता करण्यासाठी ग्रा.पं. प्रयत्न करते .पण पाणीच उपलब्ध होत नसल्याने सगळे प्रयत्न खुंटतात. अधिग्रहणाने सध्या पाणीपुरवठा होतो. पण हा स्त्रोत कधी बंद होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे परिस्थिती भीषण आहे. ग्रामस्थांना ही चिंता ग्रासते. सगळे या संकटापुढे हतबल आहेत.- सरपंच संतोष भुरके 

वॉटरकप स्पर्धेतून पाणीपातळी वाढण्यासाठी झटत आहेत गत सात वर्षापासून सातत्याने दुष्काळाशी दोन हात करत आहेत. यावर्षी वॉटरकप स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा म्हणजे संधी मानून आम्ही काम करतो. पाणी आडवून पाणी जिरवल आणि पाणीपातळी वाढली तर आमची पाण्याची समस्या सुटेल, यासाठी सगळे ग्रामस्थ झटून कामाला लागले आहेत.

- ग्रामसेवक माळोदे 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाdroughtदुष्काळHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद